छोट्या पडद्यावर लागणाऱ्या मालिका हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मालिकेतील घटना, प्रसंगे, पात्र, कथा किंवा संवाद यांसारखे अनेल घटक सामान्य प्रेक्षक स्वत:बरोबर रीलेट करतात. त्यामुळे प्रेक्षक आवर्जून या मालिका बघतात आणि त्यामुळे अनेकांना या मालिकांना लोकप्रियता मिळते. ही लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार त्याचबरोबर तंत्रज्ञदेखील मेहनत घेतात. या लोकप्रियतेवरच मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. अशातच नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा टीआरपी समोर आला आहे.
या टीआपीच्या शर्यतीत नव्यानेच सुरू झालेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेने बाजी मारली आहे. अनेक जुन्या मालिकांना मागे टाकत ही नव्यानेच सुरू झालेली मालिका अव्वल ठरली आहे. मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेत ईशाने मुर्तीकार कला खरेची भूमिका साकारली असून अभिनेता अक्षर कोठारी हा अद्वैत चांदेकर या एका बिजनेस मॅनच्या भूमिकेत झळकला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या मालिकेने अवघ्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. त्यामुळे टीआरपीच्या यादीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका जुन्या मालिकांना वरचढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
ईशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरनुसार, पहिल्या स्थानावर ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे, तर दुसऱ्या स्थानावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवीन मालिका आहे. दरम्यान याआधी पहिल्या स्थानावर ‘तुझेच मी गीत आहे’ या मालिकेचे स्थान होते. पण आता ती मालिका टीआरपीच्या शर्यतीत खाली गेली असून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका पुढे आली आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला मुंबईत म्हाडाचं मिळालं घर, दाखवली झलक, राखी सावंत म्हणते, “भावा आता तू…”
दरम्यान, नव्यानेच सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आगामी भागात या मालिकेत काय पाहायला मिळणार? यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांपैकी कोणती मालिका पहिल्या स्थानावर जाणार? यासाठीदेखील चाहते आतुर आहेत.