सध्या बॉलिवूडमधून अनेक विशेष धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातून अनेक अभिनेत्रीनी आपल्या अभिनयाने या क्षेत्रात विशेष जागा निर्माण केली आहे. त्यातील एक नाव म्हणजे सारा अली खान. साराने २०१८ मध्ये दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाने साराला खूप प्रसिद्धी मिळाली तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. तिच्या भूमिकेचेही सर्वांनी खूप कौतुक केले. (Sara ali khan on people behavior)
‘केदारनाथ’च्या यशानंतर ती ‘सिंबा’, ‘लव्ह आज कल २’, ‘अतरंगी रे’, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांमध्येही ती दिसून आली. मात्र या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाळे नाही. त्यामुळे तिने आता या क्षेत्रात मिळणाऱ्या वागणुकीवर भाष्य केले आहे. सध्या ती ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यावेळी तिने आपले मत व्यक्त केले.
‘बॉलिवूडलाईफ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले तसेच हा चित्रपट चांगला यशस्वी होईल असेही ती म्हणाली. पण याबरोबरच या क्षेत्रातील बदललेल्या वागणुकीबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मला आता अयशस्वी होण्याची भीती वाटत नाही कारण मला सवय झाली आहे”. पुढे ती म्हणाली की, “जेव्हा २०१८साली या क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा मला अनेकांचे प्रेम मिळाले. पण कालांतराने जसे माझे चित्रपट फ्लॉप होऊ लागले तसे त्या लोकांच्या वागण्यात बदल दिसू लागला. आधी मला लोक पार्टीमध्ये बोलवायचे पण आता नाही गेले तरीही त्यांना फरक पडत नाही. यश आणि अपयश हे जीवनाचे भाग आहेत.”
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून किती कमावते बबिता?, मुनमुन दत्ताचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…
त्याचबरोबर ती हेदेखील म्हणाली की, “२०१८ मध्ये मी आकाशाला गवसणी घातली आहे असं वाटलं. मला कधीही इतके प्रेम मिळाले नव्हते. पण नंतर मला प्रेम देणाऱ्यांनीच खालीही खेचले. आधी पार्टीमध्ये किंवा इतर ठिकाणी मला येण्याचा आग्रह करत असत. पण आता असे राहिले नाही”.
त्यानंतर साराला “जान्हवी कपूर असताना असुरक्षित भावना येते का?”, असं विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, “ मी व साराने एकत्रच या क्षेत्रात पाऊल ठेवलं. प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं. कोणीही कोणाचीही जागा घेऊ शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. त्यामुळे माझ्यासारखेपण कोणीच नाही असं मला वाटतं”.
साराचा नवीन चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ हा २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे.