आपल्या ‘लय भारी’ अभिनयाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांनाही ‘वेड’ लावणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुखांचा सुपुत्र आहे. रितेशने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नाही. पण त्याने मनोरंजण क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विलासराव देशमुख यांचे निधन होऊन आज इतकी वर्षे झाली असली तरीदेखील अभिनेता वडिलांच्या प्रत्येक आठवणीतून व त्यांच्या प्रत्येक शिकवणीतून त्यांचे स्मरण करत असतो.
अशातच रितेशने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने कुटुंब, करिअर व जिनिलीया यांचा पाठिंबा तसेच आईबद्दल व वडिलांनी दिलेल्या शिकवणुकीबद्दल संवाडे साधला. यावेळी रितेशने वडिलांच्या शिकवणुकीबद्दल असं म्हटलं की, “मला असं वाटतं आपले संस्कारच आपल्याला घडवतात. त्यामुळे विशिष्ट वयात आपल्यावर कसे संस्कार होतात हे खूप महत्त्वाचं असतं. मी माझ्या वडिलांकडून आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकलो”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “तुम्हाला तूमच्या मुलांना इतरांबरोबर कसं वागावं हे शिकवायचं असेल तर ते सर्वात आधी तुम्ही केलं पाहिजे, हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. इतरांना ‘आदर’ देणं यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. ही सर्वात मोठी शिकवण त्यांनी मला दिली. तुम्हाला वाटतं एखाद्याने तुमचा आदर करावा, तर सर्वप्रथम तुम्ही संबंधित व्यक्तीचा आदर करायला शिकलं पाहिजे.”
आणखी वाचा – फाल्गुनी, केतकी काकूनंतर शेखर, तन्मय व तेजसही रुपालीच्या ताब्यात, नेत्राला अजूनही कोणताच उपाय सुचेना
पुढे रितेशने वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांबद्दल असं म्हटलं की, “मला असं वाटतं आपले संस्कारच आपल्याला घडवतात. त्यामुळे विशिष्ट वयात आपल्यावर कसे संस्कार होतात हे खूप महत्त्वाचं असतं. मी माझ्या वडिलांकडून आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकलो. एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या वागण्याचं, आचरणाचं मूळ हेचं होतं की ते एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणूस होते आणि त्याचबरोबर ते लातूरच्या बाभळगावसारख्या अगदी छोट्याश्या गावातून आले होते. त्यामुळे त्या गावातला माणूस त्यांच्याबरोबर कायम राहिला”.
आणखी वाचा – अप्पी-अर्जुन एकत्र येण्यासाठी अमोलचं छत्रपती शिवाजी महाराजांना गाऱ्हाणं, हातही जोडले, एकत्र येणार का?
यानंतर रितेशने “आमच्या घरी कोणीच एकमेकांना अरे-तुरे असं बोलत नाहीत. माझे आजोबा मला तुम्ही बोलायचे. मी माझ्या दोन्ही भावांना आदराने आम्ही-तुम्ही म्हणतो. माझी दोन्ही मुलं मला आदराने आवाज देतात. ही शिकवण मला माझ्या वडिलांकडून मला मिळाली. बऱ्याचदा लोक “अरे मला तू म्हण… तुम्ही बोलू नको” असं म्हणतात, पण ते मला आता जमत नाही. कारण मला वाटतं आपण जे शिकलो आहोत, त्याचेच आचरण करुयात. त्यामुळे अगदी क्वचित काही जवळचे एक-दोन मित्र असतील त्यानं मी ‘तू’ म्हणतो नाहीतरी मी तुम्हीच म्हणतो.” असं रितेश देशमुखने सांगितलं.