वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सुवासिनी साठी खूप महत्वाचा आणि जवळचा मानला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. वडाची पूजा करतात.आणि आपल्या मालिकांमध्ये प्रत्येक सण खूप उत्साहाने साजरे होताना पाहायला मिळतात.वटपौर्णिमा हा सण सध्या तोंडावर आला आहे. आणि मालिकांमध्ये वटपौर्णिमेची धामधूम सुरु आहे.(Raj Kaveri in Danger)
चर्चा असणाऱ्या मालिकांमध्ये कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला ही मालिका अग्रेसर आहे. राज-कावेरीची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.मालिकेत त्यांच्या नात्याने अनेक चढउतार पहिले आहेत.सध्या त्यांना अनेक संकटाना सामोरे जावं लागत आहे. सानिया आणि वैदेहीच्या कारस्थानाने त्यांना रस्त्यावर आणलं आहे. पण याही परस्थितीमध्ये ते एकमेकांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहताना पाहायला मिळतात.
पाहा काय घडलं आजच्या भागात (Raj Kaveri in Danger)
मालिकेत कावेरी ची पहिली वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळणार आहे,कावेरी वडाची पूजा करते, आणि म्हणते, प्रत्येक जन्मात मला राजचं पती म्हणून हवे आहेत.आलेल्या संकटातून त्यांना सोडवण्यासाठी मला बळ दे,तर दुसरीकडे वैदेहीवर झालेल्या हल्ल्यासाठी राजला अटक होते.
हे देखील वाचा : गौरीनंतर यशच्या आयुष्यात प्रेमाची नवीन चाहूल ?
सावित्रीने जस सत्यवानाला मृत्यूच्या दारातून परत आणलं तसेच कावेरी राजला या संकटातून बाहेर काढणार का हे बघणं रंजक ठरणार आहे. नियती घेत असलेल्या परीक्षेमध्ये राज-कावेरीचं नातं खरं उतरणार का? यांसारखी अनेक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्याच वटपूर्णिमेला आलेलं हे संकट कावेरी कशी परतवून लावेल. आणि तीच हे वटसावित्रीच व्रत ती पूर्ण करेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.