‘पारू’ या मालिकेचे कथानक आता रंजक होताना पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक मालिकेत रंजक वळणे येत असतानाच आता मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे साऱ्यांची चिंता वाढून राहिली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अहिल्यादेवींचं व्रत पूर्ण करण्यासाठीचा उपवास सुरू असतो. तर पाण्याने भरलेले २१ हांडे नदीकाठाहून मंदिरातील लिंगापर्यंत नेत हे व्रत पूर्ण करायचं असतं, मात्र हे व्रत पूर्ण करताना पारू अगदी शेवटपर्यंत अहिल्यादेवींच्या बरोबर असते. (Paaru Serial Update)
अहिल्यादेवी चालताना जमिनीवरून त्यांच्या पायांना चटके लागू नयेत म्हणून पारू कळशीने पाणी शिंपडत असते. आणि त्यावरून अहिल्यादेवी चालत असतात. मालिकेत असं पाहायला मिळाले की, अहिल्यादेवी आणि पारू चालत असताना अहिल्यादेवी यांच्या हंड्यातून साप येतो ते पाहून पारूला खूपच भीती वाटते. पारूच्या हातातली कळशी खाली पडते आणि ती देवी आईला आधार देते. तितक्यात तो साप अहिल्यादेवींच्या हाताला दंश करतो, हे पाहून पारू त्या सापाला हाताला पकडून लांब फेकून देते आणि सर्वांना जोरात बोलवून अहिल्यादेवींना साप चावला असं सांगते. त्यानंतर ती आदित्यचा रुमाल घेऊन अहिल्यादेवींचा हात घट्ट बांधते आणि अहिल्यादेवींना सर्प चावलेल्या जागी तोंडाने ते विष संपूर्ण बाहेर काढते. यावर दिशा वगैरे ‘हे खूप भयानक आहे, याने तुझ्या जीवाला काहीतरी होईल’, असं सांगत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पारू कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते.
विष काढल्यानंतर पारूला थोडासा थकवा जाणू लागतो. त्यामुळे पारू एका जागी बसते. २१ हांडे पूर्ण केल्यानंतर अहिल्यादेवींचा व्रत अखेर पूर्णत्वास येतं, त्यानंतर अहिल्यादेवी व्रत पूर्ण केल्यानंतर पहिलं पारूला विचारतात आणि त्यानंतर त्या प्रसाद घेऊन थेट पारूजवळ येतात. पारुला तो प्रसाद देणार इतक्यातच पारूला चक्कर येते आणि ती अहिल्यादेवींच्या पायावर डोकं टेकत खाली पडते. त्यानंतर सगळेजण घाबरलेले असतात.
पारूला काही होणार नाही ना याची सगळ्यांना चिंता असते. मारुती गाडी काढतो आणि आदित्य व प्रीतम पारुला घेऊन हॉस्पिटलमध्ये तात्काळ जायला निघतात. गाडीतून जाताना पारूला आदित्य घेऊन बसलेला असतो. तेव्हा पारूला आदित्यच्या कुशीतच गाडीमध्ये चक्कर येते आणि ती आदित्यच्या कुशीत पडते. आता मालिकेत पारूच्या जीवाला धोका असेल का?, पारूचं काही बरं वाईट होईल का?, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.