सध्या चित्रपटांनंतर बॉलिवूडकरांचा कल वेबसीरिजकडे वळला आहे. एकामागोमाग एक वेबसीरिज येत असताना एका वेबसीरिजची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ही वेबसीरिज म्हणजे ‘हीरामंडी’. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेबसीरिजची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यात अभिनेता शेखर सुमनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा रडलो याबबाबत अलीकडेच शेखर सुमन यांनी भावुक झालेला किस्सा सांगितला. अभिनेता त्याचा मुलगा आयुषच्या निधनाने दु:खी झाला. संवादादरम्यान शेखर सुमन आपल्या मुलाची आठवण काढत भावुक झाला. (Shekhar Suman Shared Emotional Incident)
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमनने त्यांचा १० वर्षांचा मुलगा आयुषचं निधन झालं तेव्हा त्यांना असह्य वेदना झाल्या. त्यांनी सांगितले की, यकृताचा तुकडा गमावल्यानंतर त्याला जगण्याची इच्छा नव्हती आणि तो पूर्णपणे तुटला होता. शेखरने सांगितले की, त्यावेळी त्याला काहीच समजले नाही आणि तो जमिनीवर डोके टेकवून खूप रडू लागला.
मुलाखतीत हे सांगताना शेखर सुमन भावूक झाले. ते म्हणाले की, “त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे यश आणि पैसा कमावण्याची कोणतीही इच्छा उरली नाही. पूर्णपणे त्यांना थकल्यासारखे वाटत होते, केवळ आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि आर्थिक गरजा भागवण्यासाठी काम करत होते, परंतु लेकाच्या मृत्युंनतर त्याची जगण्याची इच्छा नव्हती.
शेखर सुमन पुढे म्हणाले की, “जेव्हा संजय लीला भन्साळींनी हीरामंडीमध्ये मुलगा अध्यायन सुमनच्या अभिनयाचे कौतुक केले तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले”. भन्साळींच्या या मालिकेत शेखर सुमनने झुल्फिकारची भूमिका साकारली आहे. तर अध्यायन सुमन जोरावर अली खानच्या भूमिकेत आहे, जो अतिशय अहंकारी व स्वार्थी आहे. भन्साळींची ‘हीरामंडी’ ही मालिका वेश्या आणि त्यांच्या ग्राहकांची कथा दाखवणार आहे. ही एका कालखंडाची कथा आहे ज्यामध्ये दरबारी व राज्यकर्ते वर्चस्व गाजवत होते. या वेबसीरिजमध्ये १९४० च्या दशकातील स्वातंत्र्यलढ्याची कथाही दाखवण्यात येणार आहे.