बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारुमुळे आबासाहेबांसमोर आलं अहिल्यादेवींचं सत्य, प्रियाला घेऊन मुंबईला जाणार का?, प्रीतमबरोबर लग्नाला परवानगी मिळेल का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 10, 2024 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Marathi Serial Update

आबासाहेब स्वतःच जाऊन प्रिया व प्रीतमच लग्न लावणार का?

Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम व दिशा यांच्या लग्नाचा दिवस आलेला असतो. तर आदित्यने पारुला अहिल्यादेवी व आबासाहेबांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातील दुरावा संपवण्यासाठी पुन्हा गावाकडे पाठवलेलं असतं. पारू गावाकडे जायला निघते. तितक्यातच आबासाहेब प्रिया व दादासाहेबांना घेऊन देव दर्शनाला जात असतात, मध्येच गाडी थांबवत पारू त्यांना थांबवते. त्यावर आबासाहेब फार चिडतात आणि म्हणतात, तू इथे का आली आहेस?. त्यानंतर पारू सांगते की, मला या नात्यातला दुरावा संपवायचा आहे मी इथे नाती जोडायला आले आहे. आबासाहेबांचा झालेला अपमान पाहून प्रिया देखील पारूवर चिडते, मात्र पारू सांगते की, सत्य काय आहे ते तुमच्यासमोर यायलाच हवं.

वीस वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं हे तुम्हाला कळायलाच हवं असं सांगते. आबासाहेबांसमोर वीस वर्षांपूर्वी घडलेली घटना डोळ्यासमोरुन जाते. अहिल्या व प्रताप हे गाव सोडून मुंबईला का गेले याची एक झलक त्यांच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर आबासाहेब रागा रागातच पारुला म्हणतात की, तुला अहिल्याने इथे माझी वकिली करायला पाठवलं आहे का?, असं असेल तर तू आत्ताच इथून निघून जा. माझं काही मन धजावणार नाही. हे ऐकल्यावर पारू सांगते की, तुम्हाला तुमच्या बहिणीबद्दल काय माहिती आहे. आजही पुन्हा तुम्ही एकदा माणसं ओळखायला चुकला आहात. तुमच्या बहिणीने हे गाव का सोडलं होतं हे तुम्हाला माहित तरी आहे का?, असं म्हणत पारू सर्व काही खरं खरं सांगायला सुरुवात करते.

आणखी वाचा – Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनाने बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा, कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या भावूक पोस्ट

तेव्हा पारू सांगते की, तुमच्या पत्नीचं निधन झालं त्याच्यानंतर इथे गावात डॉक्टर नव्हते, शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हतं, कसली सोय नव्हती ही सोय या गावात व्हावी असं तुमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहिल्यादेवी मुंबईला गेल्या. इथे राहून ते स्वप्न पूर्ण करणे त्यांना शक्यच नव्हतं. हे ऐकल्यावर आबासाहेब विचारतात पण अहिल्याने असं काय केलं जे या गावासाठी फायद्याचं ठरलं. या गावासाठी मी मरमर मेलो. एस फाउंडेशनची मला या गावासाठी खूप मदत झाली. एस फाउंडेशनने मिळून मला यात मदत केली. कर्ज दिलं आणि म्हणून मी हे सगळं काही करु शकलो. अहिल्या यात कुठेच नव्हती. हे ऐकल्यावर पारू पारू म्हणते की, एस फाउंडेशन हे कोणाचं आहे याचा तुम्ही एकदा विचार तरी केला का? किंवा तुम्ही कोणाला याबद्दल विचारलं तरी का?. त्यावर आबासाहेब नाही असं म्हणतात. तेव्हा पारू सांगते की, एस फाउंडेशन म्हणजेच सयाजीराव फाउंडेशन हे माझ्या देवी आईच फाउंडेशन आहे आणि तिने तुम्हाला या सगळ्यासाठी मदत केली आहे. तेव्हा दादासाहेब विचारतात, मग ती इकडे गावाकडे पुन्हा का नाही आली?.

आणखी वाचा – “शाळेची आवड नव्हती पण…”, सूरजच्या शिक्षकांनी सांगितलं त्याचं शालेय जीवन, म्हणाले, “मस्तीखोर मुलांबरोबर फिरायचा आणि…”

यावर पारू उत्तर देत म्हणते की, कारण तिच्या भावाने तिला शपथ घातली होती की तू पुन्हा मला तुझं तोंड दाखवलं तर त्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल आणि या शपथेपोटी त्या वीस वर्ष गावाबाहेर मुंबईत राहतात. हे ऐकून आबासाहेब शांतच होतात. आता आबासाहेब त्यांच्या बहिणीला म्हणजेच अहिल्यादेवींना भेटायला पुन्हा मुंबईत जाणार का? शिवाय पारूने सांगितल्याप्रमाने प्रीतम व प्रियाचं लग्न व्हायला हवं कारण प्रीतम सारखा मुलगा प्रियाला पुन्हा मिळणार नाही, असं सांगितलेलं असतं. त्यामुळे आता आबासाहेब स्वतःच जाऊन प्रिया व प्रीतमच लग्न लावणार का?, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरतंय.

Tags: marathi serialpaaru marathi serial updatepaaru serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan

चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली, 'तो' व्हिडीओ पाहून अंकिता वालावलकर म्हणाली, "त्याला सांभाळायची गरज आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.