अभिनेता शेखर सुमन सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी ते मुलाखतीही देत आहेत. अशातच त्यांनी एका यूट्यूब चॅनेलशी केलेल्या खास संवादादरम्यान त्यांनी आपल्या ११ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण काढली. पोटच्या लेकाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची नेमकी कशी अवस्था झाली होती याबाबत त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जगण्याची इच्छाशक्ती गमावली होती. एवढेच नाही तर त्याने जमिनीवर डोकं आपटून रडून हैदोस घातला होता. (Shekhar Suman Incident)
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन भावूक झाले. त्यांनी खुलासा केला की, त्यांचा मुलगा आयुष वयाच्या १०व्या वर्षी वारल्यानंतर यश मिळवण्याची आणि पैसे कमवण्याची त्यांची इच्छा संपली. सगळं संपल्याचा त्याला भास झाला. संपूर्ण जग त्याला रिकामं भासू लागलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीच ते काम करायचे. पण खरंच त्यांची जगायची इच्छा नव्हती. शेखर सुमन यांचा लेक आयुषला एंडोकार्डियल फायब्रोइलास्टोसिस नावाचा दुर्मिळ हृदयविकार होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
अभिनेत्याने पुढे सांगितले की, आयुष गेल्यानंतर त्याने अनेक ज्योतिषांना हात दाखवला होता की त्याच्याबरोबर असे का झाले, तेव्हा ते म्हणाले की, या जगात तू एकटाच नाहीस, अनेक लोकांबरोबर असे घडले आहे. पण ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे, ज्याच्यावर अशी घटना घडते तोच त्याची वेदना अनुभवू शकतो. यशचं येऊन दर्शन देईल, कुठेतरी तो दिसेल या त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या दिशेने त्यांनी विचार सुरू केला आणि त्यांचा आयुष्यातील प्रवास सुरु ठेवला.
शेखर पुढे म्हणाला, “अलका माझी पत्नी बाबा विश्वनाथच्या मंदिरात गेली होती. त्यावेळी २००९मध्ये मी पटना येथे निवडणूक लढवत होतो. प्रचार सुरू होते, भाषणही सुरू होती. या गडबडीच्या काळात मी अनेकदा घरून आलेला फोन उचलला नाही. पण त्यादिवशी माझ्या मनात काय आलं माहीत नाही, मी फोन उचलला आणि हॅलो म्हटलं, अलका तिथून हसली आणि म्हणाली काय झालं माहीत आहे का?, मी तिला दुसरा प्रश्न विचारला सर्व काही ठीक आहे की नाही असा न विचारता, मी तिला थेट विचारले की, तू आयुषला भेटली का?, तर अलका म्हणाली, ‘तुला कसे माहित?’
शेखरची पत्नी अलकाने अभिनेत्याला फोनवर सांगितले की, “मी त्याला अर्धा सेकंद भेटले. मी गाडीत बसले होते आणि एक आवाज मला आला, विचारले, काही पैसे द्याल का?, आणि मी १० रुपयांची नोट काढली आणि त्याला दिली. मी काहीतरी करण्यात व्यस्त होते आणि तेवढ्यात तिथून आवाज आला की, “याने माझे काय होईल?”
अभिनेता म्हणाला, “आयुष आजारी असताना असे म्हणत असे. कारण त्याला अनेक पदार्थ खाण्यास मनाई होती. लोणचे व पापड तो खाऊ शकलो नाही. हे खाऊ शकत नाही, ते खाऊ शकत नाही. आणि जर आपण त्याला थोडेसे दिले तर तो म्हणायचा, “एवढ्याने माझे काय होईल?”, त्यानंतर जेव्हा अलकाने हे ऐकले आणि पाहिले तर तो आयुष होता. त्यानंतर ती वाकून आणखी पैसे काढण्यासाठी वळली तेव्हा मात्र तो तिथून निघून गेला. गाडी शेताच्या मधोमध उभी होती. कुठूनही कोणी येऊ शकत नव्हते वा जाऊ शकत नव्हतं”.