कलाकारांचे लग्न, घटस्फोट आणि त्यासंदर्भात रंगणाऱ्या चर्चा बी-टाऊनला काही नव्या नाहीत. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपशिखा नागपालही या चर्चांच्या भोवऱ्यात अडकली. तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला, संसारही थाटला. पण दीपशिखाचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं. तिचा दोनवेळा घटस्फोट झाला. त्यानंतर दीपशिखाच्या खासगी आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगल्या. आता वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही तिला लग्न करण्याची इच्छा आहे. याचबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपशिखाने भाष्य केलं. दीपशिखा आता नव्या जोडीदाराच्या शोधात आहे. (Deepshikha Ngpal ready to marry after divorce)
दीपशिखा म्हणाली, “मी तीनवेळा, चारवेळा लग्न करु शकते. मला यामध्ये काहीच लाज वाटत नाही. माझं आयुष्य मी जगत आहे. दोन लोक एकत्र राहत ज्यांचं अजिबात पटत नाही हे मी माझ्या डोळ्यांनी बघते. मी नेहमीच चुकीच्या कारणांमुळे लग्न केलं. योग्य कारण लक्षात ठेवूनच तुम्हाला लग्न केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कारणासाठी आपण फक्त मुलांनाच दोष देऊ शकत नाही. मला असं वाटतं की, मी खूप रोमँटिक आहे. मी प्रेम, रोमान्स लग्न यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. ज्यामुळे दोन व्यक्ती एकत्र राहू शकतात. पण हा विश्वासच नसेल तर वैयक्तिक जीवन एकट्याने जगणं उत्तम आहे. तुम्ही तुमचं आयुष्य जगा”.
आणखी वाचा – १४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…
दीपशिखाचा पहिला घटस्फोट झाला. त्यानंतर तिने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांचा संसार थाटल्यानंतरही तिचं हे नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. पण यानंतर दीपशिखाला मोठा धक्का बसला होता. ती डिप्रेशनमध्ये होती. दीपशिखा म्हणाली, “सगळ्यातून बाहेर पडायला मला मला पाच ते सहा वर्ष लागली. स्वतःचाच गुन्हा आहे की काय असं मला सतत वाटत होतं. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, असं वागणं बदललं पाहिजे”.
पुढे ती म्हणाली, “बौद्ध जीवन जगायचं कसं? ही कला मी आत्मसात केली. नव नवीन गोष्टी मी शोधायला लागले. स्वतःच अभ्यास केल्यानंतर माझ्याबरोबरच अशा गोष्टी का घडत होत्या? हे लक्षात आलं. मी माझी उर्जा आणि दर्जा वाढवला आहे. कारण मी पुन्हा चुकीच्या मार्गांची यामधून निवड करणार नाही. मी आता स्वतःवर काम केलं आहे. सात वर्षांपासून मी एकटीच आहे. पण हे देवा माझं कोणीच नाही असं मी कधीच केलं नाही. योग्य ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल. आता मला काय हवं आहे हे कळालं आहे”. २००७मध्ये जीत उपेंद्रसह दीपशिखाचा पहिला घटस्फोट झाला. त्यानंतर २०१२मध्ये तिने केशव अरोराबरोबर लग्न केलं. २०१६मध्ये त्याच्याबरोबरही दीपशिखाचा घटस्फोट झाला. आता ती नव्या जोडीदाराच्या प्रतिक्षेत आहे.