मनोरंजन क्षेत्रात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितचं नाव घेतलं घेतलं जातं. अभिनय, सौंदर्य, नृत्य यामुळे तिने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बेटा’ या चित्रपटातील ‘धक धक’ गाण्याने सर्वांनाच वेड लावले. त्यानंतर ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’. ‘देवदास’, ‘खलनायक’ अशा दमदार चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. १९९९ साली तिने डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्न केले. लग्नानंतर मात्र माधुरी चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्यानंतर ती पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली. (madhuri dixit on career break)
माधुरीने श्रीराम यांच्याबरोबर लग्न केले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिने लग्न केल्यानंतर ती परदेशात निघून गेली आणि अभिनयापासून दूर झाली. त्याबद्दल तिने आता मध्यमांमध्ये खुलासा केला आहे. ती म्हणाली की, “ते सर्व माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. सामान्य मुलीप्रमाणे माझीही स्वप्न होती. मला माझे एक छोटसं कुटुंब हवं होतं”.
त्यानंतर तिला अभिनय सोडण्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “मला मूल होणार होतं. मी गरोदर होते. त्यावेळी मी अभिनय करणं सोडलं. मी माझं पूर्ण लक्ष माझ्या मुलांच्या सांगोपनावर देण्याचा निर्णय घेतला”.
मुलं मोठी झाल्यानंतर २००७ साली ती पुन्हा अभिनयाकडे वळली. ‘आजा नचले’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. हा चित्रपट पूर्णतः नृत्यावर आधारित होता. माधुरीच्या दमदार कमबॅकने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसून आली. सध्या ती अनेक डान्स रिॲलिटी शोची परीक्षक म्हणूनदेखील काम पाहिले आहे. सध्या ती याच कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाची परिक्षक आहे. तिच्या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर २०२२ साली ती ‘द फेम गेम’ या चित्रपटात दिसून आली होती.
तिने २००३ साली पहिल्या मुलाला जन्म दिला. तसेच दोन वर्षंनंतर तिला दुसरं मुलगा झाला त्याचे नाव रयान असे ठेवले. ती तिच्या पूर्ण कुटुंबाबरोबर अनेकदा दिसून येते. तसेच सोशल मीडियावर देखील ती आपल्या कुटुंबासमवेतचे अनेक फोटो शेअर करते.