मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकतेच गोविंदाची भाची आरती सिंह व दीपक चौहानचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आरतीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. पण यामध्ये गोविंदा व कृष्णा अभिषेकमधील असलेल्या वादविवंडांच्या चर्चादेखील पाहायला मिळाल्या. कृष्णा व गोविंदा यांचे भांडण असल्याने गोविंदा भाचीच्या लग्नाला येणार की नाही? याबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते. मात्र गोविंदाने भाचीच्या लग्नाला हजेरी लाऊन सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला. तसेच गोविंदा लग्नामध्ये सहभागी झाल्याने कृष्णा व त्याच्यामध्ये असलेले सर्व वाद संपल्याचे देखील सर्वांनी अंदाज बांधले. (govinda at arti singh wedding)
मनोरंजनक्षेत्रांमध्ये अनेक नातेसंबंधामध्ये वाद-विवाद असलेले पाहायला मिळतात. कृष्णा व गोविंदा ही मनोरंजनकक्षेत्रातील लाडकी मामा-भाच्याची जोडी होती. पण काही कारणांमुळे आठ वर्षांपूर्वी दोघांमध्ये वाद झाले. त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. ही भांडणं इतकी विकोपाला गेली होती की दोघंही एकमेकांबद्दल बोलणेही पसंत करत नव्हते. त्यामुळेच आरतीच्या लग्नाला गोविंदा येणार का? हा प्रश्न दोघांच्याही चाहत्यांना पडला होता. पण गोविंदा अखेर आरतीच्या लग्नाला उपस्थित राहिला. पण गोविंदाची पत्नी व मुलांची मात्र गैरहाजेरी पाहायला मिळाली. अशातच लग्नामध्ये कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहच्या एका कृतीमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले.
आरतीच्या लग्नामध्ये वहिनी कश्मिरा उपस्थितांचे आदरातिथ्य करताना दिसली. मामा गोविंदाच्याही ती पाया पडली आणि आशिर्वाद घेतले. तसेच त्यांची माफी मागतानाही दिसली. त्यावर गोविंदानेही तिला ‘खुश रहा’ असा आशिर्वाद दिला. याबद्दल तिने ‘ई टाइम्स’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने सांगितले की, “गोविंदा माझ्यावर व कृष्णावर नाराज होते. आरतीवर त्यांचा रंग नव्हता. त्यामुळे आरतीच्या लग्नामध्ये ते येतील अशी खात्री होती. ते आले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला”.
आणखी वाचा – “कपडे बदलताना त्याने माझं…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मालिकेत काम करण्यावरुन धक्कादायक खुलासा, म्हणाली, “धमकी दिली आणि…”
पुढे ती म्हणाली की, “आम्ही जेव्हा एकमेकांसमोर आलो तेव्हा आमची नजरानजर झाली. मी त्यांच्या पाया पडले पण त्यांनी मला पाया पडू दिले नाही आणि मला खुश राहण्याचा आशिर्वाद दिला. त्यानंतर ते माझ्या मुलांना भेटले. त्यांच्याशी माझ्या व कुटुंबियांच्या खूप गप्पा झाल्या”.
दरम्यान गोविंदा जेव्हा लग्नामध्ये उपस्थित राहिले तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “देवाची आरतीवर कृपा आहे. तिला कोणाचीही नजर नको लागू दे”, असे ते म्हणाले. गोविंदाच्या उपस्थितीने कृष्णादेखील भाऊक झालेला पाहायला मिळाला. त्यावर तो म्हणाला की, “मामाच्या येण्याने मला खूप आनंद झाला आहे. आम्ही भावनिकरित्या एकमेकांशी जोडलेलो आहोत”.
दरम्यान आरतीच्या लग्नामध्ये मनोरंजनक्षेत्रातील सर्व कलाकार उपस्थित होते. सगळेजण आरतीच्या लग्नामध्ये धमाल-मस्ती करताना दिसले.