लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय व अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. स्टारकिड्स विषयी जाणून घेण्यास नेटकरी कायम उत्सुक असतात त्यात आराध्याचा देखील समावेश आहे. अशातच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील परफॉर्मन्समुळे आराध्या चर्चेत आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आराध्याने तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. आराध्यामध्ये ऐश्वर्यासारखी प्रतिभावान अभिनेत्री बनण्याची क्षमता असल्याच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली आल्या आहेत.
आराध्याच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त तिला प्रेरित करण्यासाठी व तिचा परफॉर्मन्स बघण्यासाठी ऐश्वर्या-अभिषेक गेले होते. त्याचबरोबर अगस्त्य नंदा, वृंदा राय, अमिताभ बच्चन हेदेखील आराध्याच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र, या कार्यक्रमाला जया बच्चन, श्वेता बच्चन व नव्या नवेली नंदा या गैरहजर असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आराध्याच्या या खास कार्यक्रमात बच्चन कुटुंबातील महिला गैरहजर असल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
जया बच्चन, श्वेता बच्चन व नव्या या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने सोशल मीडियावर त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या गैरहजेरीवर अनेकांनी कमेंट्स करत असे म्हटले आहे की, “प्रत्येक कुटुंबातील भांडणाचे कारण हे सासू व नणंदच असते, जया बच्चन यांना ऐश्वर्याशी समस्या आहे, पण त्या मुलाने तिचे काय केले?, अगस्त्यच्या चित्रपटाच्या प्रीमियरला ती आली होती ना? मग ऐश्वर्या किंवा त्या आराध्यासाठी न येता निदान अभिषेकसाठी तरी यायला हवं होतं” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी जया बच्चन, श्वेता बच्चन यांच्या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबियांमध्ये घरगुती वाद होत असल्याचे पाहायला मिळत होते.न नुकतेच अभिषेक-ऐश्वर्या यांनी घरातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून हे कुटुंबीय काहीनाकाही कारणावरून चर्चेत आहेत. अशातच आता या विषयाचीही भर पडली आहे.