बॉलीवूडमध्ये ७० ते ८० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल या आज चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहेत. ३ फेब्रुवारी १९५३ रोजी अमृतसरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना सुरुवातीपासूच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७८ साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘चष्मे बद्दूर’, ‘किसी से ना कहना’, ‘अनकही’व ‘फिराक’ या चित्रपटांमध्ये त्यांनी कमालीच्या भूमिका केल्या. (actress dipti naval life )
आजही त्या प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. दीप्ती यांनी व्यावसायिक चित्रपट करण्याऐवजी पाथ ब्रेकिंग चित्रपटांना अधिक पसंती दिली. त्यामुळे त्या प्रत्येक निर्मात्याच्या नजरेत येऊ लागल्या. तसेच ८० च्या दशकामध्ये त्यांची फारुख शेख यांच्याबरोबरची जोडी अधिक पसंती केली गेली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये चांगले यश प्रस्थापित केले. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अधिक समस्यांना सामोरे जावे लागले. दीप्ती यांचा लग्नानंतर दोन वर्षातच वेगळे होण्याचा निर्णय घेताला. तसेच त्या जेव्हा दुसऱ्यांदा प्रेमात पडल्या तेव्हाही त्यांच्या प्रियकराचा मृत्यू झाला.
दीप्ती यांनी १९७८ साली श्याम बेनेगल यांचा चित्रपट ‘जुनून’ या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. यादरम्यान त्यांची ओळख दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १९८५ साली त्यांनी लग्न केले आणि काही वर्षांनी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले. त्यानंतर १५ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला.
एका दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “आमच्यामध्ये कधीही भांडण झाले नाही. पण आमचे रस्ते मात्र वेगवेगळे होते. मी अभिनयात करिअर करण्यासाठी न्यू यॉर्कवरुन भारतात आले होते. तसेच प्रकाश दिल्लीला गेले. प्रकाश यांनी लग्नाला नेहमी महत्त्व दिले. पण माझ्यामते हे त्यांना खूप उशिरा समजले”. पुढे त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा तो निर्णय त्यांना पटला होता”.
पतीपासून वेगळे झाल्यानंतर त्या अभिनेते विनोद पंडित यांच्या प्रेमात पडल्या. ‘थोडा आसमान’ या मालिकेदरम्यान दोघांची ओळख झाली होती. तेव्हा ते एकमेकांना आवडू लागले होते. पण लग्न करण्याचा विचार करण्याच्या आधीच विनोद यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्या पूर्णतः कोसळल्या होत्या.आज त्या ७२ वर्षाच्या आहेत. त्या एकटे आयुष्य व्यतीत करत आहेत.
विनोद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. या माध्यमातून त्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत करतात. त्या मनोरंज क्षेत्रांमध्ये आजही काम करत आहेत. २०२३ साली त्या ‘गोल्डफिश’मध्ये दिसल्या होत्या.