Chahatt Khanna divorce : टीव्ही इंडस्ट्री आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्री चाहत खन्ना सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतेच तिच्या धर्मांतराविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. चाहतने सांगितले की, इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता, त्यावर कोणीही तिला जबरदस्ती केली नव्हती. तिने तिच्या घटस्फोटाबद्दल आणि वादांबद्दलही भाष्य केले.
सुभोजीत घोष यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहत खन्ना म्हणाल्या, “माझ्या शब्दांचा नेहमीच चुकीचा अर्थ लावला जातो. आजही मी काही बोलले, तर त्याचाच एक भाग उचलून चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. मी एक अत्यंत धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मी दिवाळीइतक्याच प्रेमाने ईद साजरी करते. मी इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो माझा स्वतःचा निर्णय होता. लोकांनी म्हटले की माझ्यावर जबरदस्ती केली गेली, पण मी तसे कधीच म्हटले नाही. माझा इस्लाम आणि सनातन धर्म या दोन्हींवर विश्वास आहे आणि मी स्वतःला कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित ठेवत नाही.”
आणखी वाचा – “मला कोणताही पश्चात्ताप नाही”, लग्नाच्या तीन वर्षांतच संसार मोडला, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…
ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलली, “मला खूप वाईट, निराश आणि घाबरल्यासारखं वाटत होतं. माझ्यासोबत जे घडत होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझी प्रतिष्ठा डागाळली जात होती. काही लोक तर असंही म्हणाले की मला काम मिळणार नाही. पण, जसजशी मला आयुष्य आणि लोकांबद्दल अधिक चांगली समज येऊ लागली, तसतसा माझा आत्मविश्वास वाढला आणि या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटू लागल्या. एके वेळी मी गोंधळलेली होते, पण आता मला पूर्वीपेक्षा अधिक कणखर वाटतं.”
आणखी वाचा – अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…
यापूर्वी २०२४ मध्ये, टेलीटॉक इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत चाहत म्हणाली होती, “मला माझ्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. घटस्फोटानंतर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मला चार ते पाच वर्षे लागली. लग्नासाठी मी स्वतःहून इस्लाम धर्म स्वीकारला; कोणीही मला त्यासाठी जबरदस्ती केली नाही. नंतर मला सांगण्यात आले की माझ्या देवाची पूजा करू नकोस; हाच योग्य मार्ग आहे, आणि मी एका हरवलेल्या मुलासारखी त्याच मार्गावर चालत राहिले.” चाहतने २००६ मध्ये भरत नरसिंगानीशी लग्न केले, पण काही काळानंतरच हा विवाह संपुष्टात आला. त्यानंतर तिने २०१३ मध्ये फरहान मिर्झाशी लग्न केले, पण मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप करत २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिला झोहर आणि दित्या नावाच्या दोन मुली आहेत, ज्यांच्यासोबत ती पुढे वाटचाल करत आहे.





