बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा. या कपलचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये या जोडप्याच्या लग्नाची नेहमीच आतुरता असते. पण या दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर असल्यामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं. पण सध्या दोघं वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अर्जुनने केलेली सोशल मीडियावरील पोस्ट पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टवरून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.(Arjun’s Photo Viral From Vacation)
अर्जुन व मलायका अनेकदा आपलं प्रेम उघडपणे व्यक्त करताना दिसतात. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी चुकवत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात आहे. अशातच अर्जुनने शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याच्या व्हॅकेशनचे फोटो चाहत्यांसह शेअर केले. “आयुष्य लहान आहे, विकेण्ड मोठा आहे” असं म्हणत लॅपटॉपसमोर एकटाच बसलेला असतानाचा फोटो त्याने शेअर केला.
वाचा – अर्जुन व मलायका यांच्यात का बिनसलं? (Arjun’s Photo Viral From Vacation)
या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी बरेच प्रश्न केले आहेत. एका चाहत्याने तर त्याला मलायकाबद्दल विचारलं. ती तुझ्यबरोबर का नाही? असा प्रश्न केला. तर काहींनी त्यांचा ब्रेकअप झाला असल्याच कमेंट करत म्हटलं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ”त्या दोघांना या अफवांवर व्यक्त होणं महत्त्वाचं वाटत नाही. अशाप्रकारच्या चर्चांवर त्यांना हसू येत आहे. लोक अगदी पटकन एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करतात”.
अर्जुन-मलायका यांच्या नात्याबाबत नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट काही नवीन नाहीत. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत असतात. पण मलायका-अर्जुन कधीही या अफवांवर व्यक्त होताना दिसत नाहीत. दोघंही बरीच वर्ष एकमेकांबरोबर आहेत, पण दोघांचाही लग्नाचा कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.