आज महाराष्ट्रातील मुंबई येथे शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. मतदानासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये आता ५६ वर्षीय अभिनेता अक्षय कुमारने देखील सकाळी लवकर रांगेत उभे राहून मतदान केले आहे. भारतीय नागरिक म्हणून त्याने पहिल्यांदाच मतदान केले असून इतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय नागरिक म्हणून पाहिल्यांदाच मतदान करताना किती आनंद होत आहे याबद्दलही तो व्यक्त झाला आहे. (akshay kumar first time vote)
अक्षय मतदान करत असल्याचे एएनआयच्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला. त्याने रांगेत उभे राहून मतदान केले. तसेच मध्यमांशी संवाद साधताना म्हणाला की, “माझा देश मजबूत असावा, विकास व्हावा असे वाटते. हे सर्व लक्षात ठेऊन मी मतदान केले आहे. ज्याला योग्य वाटते त्याला व्यक्तीने मतदान करावे. तसेच मतदानाची टक्केवारी चांगली राहील असे मला वाटते”.
#WATCH | Actor Akshay Kumar shows the indelible ink mark on his finger after casting his vote at a polling booth in Mumbai.
— ANI (@ANI) May 20, 2024
He says, "…I want my India to be developed and strong. I voted keeping that in mind. India should vote for what they deem is right…I think voter… pic.twitter.com/mN9C9dlvRD
त्यानंतर माध्यमांनी त्याला विचारले की, “रांगेत उभे राहून आपलं नंबर येण्याची वाट बघावी लागत आहे. हे सर्व कसं वाटत आहे?”, त्यावर अक्षय म्हणाला की, “मी काय करावं? रांग मोडून पुढे जाऊ? , तसेच पहिल्यांदा मतदान केल्यावर कसे वाटते? यावर त्याने बोटाला असलेली शाई दाखवत म्हणाला की, “मला खूप छान वाटत आहे”.
अनेक वर्षांपासून अक्षयच्या नागरीकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित राहिले होते. या विषयावरुन अनेकदा त्याला ट्रोलदेखील केले गेले. त्यानंतर त्याने २०१९ साली भारतीय पासपोर्टसाठी अर्जदेखील केला होता मात्र कोरोना समस्येमुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब लागलं. त्यानंतर २०२३ साली अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाले. भारताचा नागरिक झाल्यानंतर त्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडले असल्याचेही सांगितले.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो आता टायगर श्रॉफबरोबर ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. तसेच आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी’च्या तिसऱ्या भागात अर्शद वारसीबरोबर दिसून येणार आहे.