रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने तब्बल १८ वर्षांनंतर IPLच्या ट्रॉफीवर टीमचं नाव कोरॉफीवर टीमचं नावर कांनंतर आा आरलं. हा क्षण सगळ्यांसाठीच अभिमानाचा होता. पंजाब किंग्ज विरुद्ध आरसीबी असा रंगतदार सामना झाला. या मॅचच्या शेवटचे दोन बॉल असतानाच मैदानात विराट रडू लागला. एकाच टीमकडून १८ वर्ष खेळणं आणि मेहनतीच्या जोरावर टीमला ट्रॉफी मिळवून देणं सारं सारं काही त्याच्यासाठी स्वप्नवत होतं. आयपीएलमधील हा ऐतिहासिक क्षण लाखो क्रिकेटप्रेमींनी थेट स्टेडियममधून अनुभवला. बंगळूरसह कर्नाटक आणि देशभरातील आरसीबी टीम प्रेमींनी अगदी जोरदार सेलिब्रेशन केलं. बुधवारी (४ जून) आरसीबी टीम बंगळूरमध्ये दाखल झाली. तिथे या टीमचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. मात्र या विजयाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागलं. (Vivek oberoi on bengaluru stampede)
आरसीबीने आयपीएलमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय लक्षात घेता बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्नाटक सरकारद्वारे या स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार होणार होता. खेळाडूंना भेटण्यासाठी स्टेडियमबाहेर हजारो क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली. मात्र ही गर्दी बहुदा आजोजकांना नियंत्रित करता आली नाही. चेंगराचेंगरी होण्यास सुरुवात झाली. यामध्ये तब्बल ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३३ जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली.
आणखी वाचा – कॅन्सरशी झुंज तरीही हिना खानचा लग्न करण्याचा निर्णय, रॉकीसह गुपचूप केला विवाह, साडीवर ८ अंक कोरला कारण…
Deepest sorrow fills us as we mourn the lives tragically lost in the Bengaluru stampede. It's truly saddening to lose loved ones, especially during what should have been a moment of collective joy in cricket.
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) June 4, 2025
To the families and friends now facing this unimaginable void, our…
या दुर्देवी घटनेबाबत सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही सेलिब्रिटी मंडळींनीही याबाबत पोस्ट शेअर केली. अभिनेता विवेक ओबेरॉयनेही या दुःखद घटनेबाबत त्याचं मत मांडलं. तसेच श्रद्धांजली वाहिली. तो म्हणाला, “बंगळूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत मी शोक व्यक्त करतो. आपल्या जवळच्या माणसांना गमावणं खूप मोठं दुःख आहे. क्रिकेटला सेलिब्रेट करताना ही घटना घडणं त्याहीपेक्षा वाईट आहे”.
पुढे तो म्हणाला, “या घटनेचा सामना करणारे कुटुंबिय व मित्र-परिवार यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आम्हीही तुमच्याबरोबर दुःखी आहोत. या कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला अधिक पाठिंबा मिळेल अशी आशा मी करतो. शक्ती आणि शांती आपल्याबरोबर कायम राहो”. विवेकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. योग्य नियोजन झालं असतं तर हे घडलंच नसतं, ज्यांनी जीव गमावला त्याला जबाबदार कोण? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.