टेलिव्हीजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रोशनी वालिया. रोशनीने बालिका वधू, मैं लक्ष्मी तेरे आंगन की, देवों के देव महादेव, महाराणा प्रताप सारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. सन ऑफ सरदार २ चित्रपटात तर ती अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोशनीने कलाक्षेत्रात स्वतःच्या मेहनतीवर एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. पण तिचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. कुटुंबामधूनच तिला बराच संघर्ष करावा लागला. शिवाय आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे बरेच वाईट अनुभवही आले. रोशनीने याचबाबत आता सांगितलं आहे. (roshni walia life)
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत रोशनी म्हणाली, “माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. ते एकत्र राहत नाहीत. आम्ही वडिलांच्या संपर्कातही नाही. त्यांचं एक वेगळं कुटुंब आहे. ते आयुष्य एन्जॉय करतात त्यात मी खूश आहे. पण अगदी वाईट काळात माझ्या आईनेच उत्तम साथ दिली हेच माझं म्हणणं आहे. आम्हीही तिची साथ दिली. तिच आमचं कुटुंब आहे. अशावेळी रक्ताची नातीही उपयोगी पडत नाहीत”.
आणखी वाचा – ‘सैयारा’ पाहून भारती सिंगला अश्रू अनावर, पती हर्ष लिंबाचियाही झाला भावुक, चित्रपटाबाबत म्हणाले…
“मुंबईत आमचं खूप मोठं कुटुंब आहे. आईचा जवळचा मित्र परिवारच आमचं कुटुंब आहे. माझे मित्रही आमचं कुटुंब आहेत. त्यात आम्ही खूश आहे. आमचा एकही नातेवाईक नाही. कारण ते काही आमच्यासाठी सख्खं नातं असं राहिलं नाही. माझ्या आईला त्यांनी खूप सुनावंल आहे. मुंबईत जात आहेस तर रडत रडत परत येशील असं म्हणाले. पण आज असं म्हणणारे लोक तिथेच आहेत आणि आम्ही खूप बदललो आहोत. आमचं आयुष्य पूर्णपणे बदलेलं आहे. मी सगळ्यांचा आदर करते पण पाठिंबा कोणालाच देत नाही”.
पुढे रोशनी तिच्या नातेसंबंधांविषयी म्हणाली, “डेटिंग करणं माझ्यासाठी कधी कठीण नव्हतं. कारण सगळ्यांनाच मी आवडायची. १६ ते १७ वर्षांमध्येच माझा पहिला बॉयफ्रेंड होता. पण ते लहान मुलांसारखं प्रेम होतं. पण प्रेमात कधी मी निराश झाले नाही. प्रेम बरोबर नाही तर मी पागल होणार असं कधी मी केलं नाही. शाळेतही मुलंच माझे मित्र होते. मुली मैत्रिणी खूप कमी होत्या. त्यामुळे शिक्षकांना माझी मुलांबरोबरची मैत्री आवडायची नाही. सगळ्या मुलांबरोबरच माझं अफेअर आहे असं माझ्या शिक्षकांना वाटायचं”.





