स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेचा नुकताच नवीन भाग सुरू झाला आहे. शिर्के कुटुंबाचा अंत झाला असून मालिकेतील जयदीप-गौरी यांचा पुनर्जन्म दाखवण्यात आला आहे. ही मालिका आता तब्बल २५ वर्ष पुढे सरकली आहे. या सगळ्यात मालिकेतील काही जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आणि त्यामुळे नवीन पात्रांची एण्ट्री झाली आहे. (Harshada Khanvilkar And Amey Barve’s Entry In Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial)
मालिकेच्या या नवीन भागात ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील वैभव अर्थात अभिनेता अमेय बर्वेची एण्ट्री होणार आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण तो या मालिकेतून एका महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री नंदिता पाटकर, ज्ञानदा रामतीर्थकरसह त्याच्या अनेक चाहत्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अमेयला या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचीही या मालिकेत धमाकेदार एण्ट्री होणार आहे. यात हर्षदा सरपंचाच्या भूमिकेत दिसणार असून वसुंधरादेवी अहिरराव असं त्यांच्या भूमिकेचं नाव आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील त्यांची भूमिका हटके असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा – अमोल कोल्हे ‘ऑन ऍक्शन मोड’, एसटीतून प्रवास केल्याने नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “निवडणुका आल्यामुळे…”
दरम्यान नुकताच या मालिकेचा नवीन भाग प्रेक्षकांसमोर आला आहे. याआधीच्या भागाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता या नवीन भागासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच अमेय, हर्षदा यांव्यतिरिक्त आणखी काही कलाकारांचीही या मालिकेत एंट्री होणार आहे. त्यामुळे आता हे नवीन कलाकार कोण? याविषयीदेखील चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे.