सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून ठिकठिकाणी बाप्पाचे उत्साहात आगमन झालं आहे. अनेक मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. मालिकाविश्वातील अभिनेत्री व निर्माती शर्मिष्ठा राऊत हिच्या घरी बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून तिने तिच्या पती तेजस देसाईसह मोठ्या भक्तिभावाने बाप्पाचे आदरतिथ्य केले आहे. (Sharmishtha Raut Ganpati)
शर्मिष्ठा राऊतच्या घरात गेल्या तीन वर्षांपासून बाप्पाची प्रतिष्ठापना होत असते. विशेष म्हणजे, शर्मिष्ठाने मागच्याच वर्षी स्वतःच्या हक्काचे घर घेतलं असून तिचं या घरातील पहिला गणेशोत्सव आहे. पुढच्याच वर्षी ती व तिच्या पतीने स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा केली होती. तीदेखील पूर्ण झाल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवात शर्मिष्ठाने एक छान उपक्रम राबवण्याचा ‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीत सांगितले आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच सुरु करणार स्वतःचं हॉटेल, गणपतीनिमित्त केली घोषणा, म्हणाली, “उद्योजिका म्हणून…”
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने बाप्पाकडे मागितलेली मागणी सांगताना तिच्या या उपक्रमाबाबत बोलली. शर्मिष्ठा म्हणाली, “लग्नानंतर आमच्या घरातील बाप्पाचं हे तिसरं वर्ष आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा आमच्या घरी गणपती बाप्पा आले होते, तेव्हा आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. त्यावेळेस आम्ही दोघांनी मागितलं होतं की, आमचं स्वतःचं घर होऊ दे. ही इच्छा मागच्या वर्षी पूर्ण झाली आणि यावर्षीच्या आमच्या स्वतःच्या घरी पहिल्यांदा गणराया आले.”
“त्याच्याच पुढच्या वर्षी आम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायची इच्छा मागितली होती. त्याबाबत आमचं आधीच ठरलं होतं. पण ती इच्छा पूर्ण होण्याची मागणी बाप्पाकडे मागितली होती. कारण त्यानिमित्ताने ५० लोकांचं युनिट आपल्या हाताखाली येतं, त्यांना रोजगार मिळतो. मला वाटत होतं की, नोकरी गरजेचीच आहे पण त्याचबरोबर असं काहीतरी केलं तर सगळेच पुढे जाऊ शकतात. म्हणून आम्ही ही इच्छा मागितली आणि डिसेंबरमध्ये यावर आमची चर्चा सुरु झाली. मार्चमध्ये आमच्या प्रोडक्शन हाऊसचं लॉंचिंग झालं आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही पहिली मालिका सुरु झाली.”, असं शर्मिष्ठा म्हणाली.
हे देखील वाचा – …अन् लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी संजय मोनेंवर झाली होती शस्त्रक्रिया, सुकन्या मोने राहिल्या खंबीर, तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
पुढे ती तिच्या उपक्रमाबद्दल बोलताना शर्मिष्ठा म्हणाली, “आम्ही दोघं पहिल्याच वर्षी हा उपक्रम राबवत आहोत. ही संकल्पना आमच्या जवळच्या मैत्रीण व माझ्या भावाकडून मिळाली आहे. मुळात आम्ही प्राणीप्रेमी आहोत. त्यामुळे आम्ही असा विचार केला की, आपण बाप्पाला देणारे कोण आहोत? तोच आपल्याला सगळं देतो. बाप्पा आपल्या घरात आल्यामुळे आपण मनोभावे त्याचं आदरतिथ्य करतो. त्यामुळे त्याने जी सृष्टी निर्माण केली आहे, त्या लोकांसाठी व प्राण्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं की, जे लोक आम्हाला बाप्पाच्या दर्शनावेळी जे कोणी शैक्षणिक साहित्य देणार, ते साहित्य अनाथाश्रमांना देऊ. तर जे कोणी प्राण्यांचे खाद्य घेऊन येईल, ते प्राणी निवारागृहाला व रस्त्यावरील प्राण्यांना खायला देऊ.”, असं शर्मिष्ठा म्हणाली.