Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकरच्या लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या जोडीची अचानक लग्नसोहळ्याची बातमी समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याच्या या फोटोंवर कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुरुची व पियुषने अगदी थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पाडला. मेहंदी, हळदी समारंभाचे फोटोही त्यांचे समोर आले. तसेच दोघांच्या रिसेप्शनच्या लूकने अधिक लक्ष वेधून घेतलं होतं. सुरुची अडारकरचं हे पहिलंच लग्न आहे. तर पियुष हा तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. लग्नसोहळा उरकताच पियुषने त्याच्या या लग्नाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत पियुषने त्याच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
लग्नसोहळ्याबाबत बोलताना पियुषने त्याच्या कुटुंबियांना प्राधान्य देत म्हटलं की, “आपल्या कुटुंबातील जवळचे सदस्य व मित्रपरिवार प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, तसेच ते तुम्हाला सर्वांशी संवाद साधण्याची परवानगी देतात. अगदी खात्रीशीर तुम्ही सांगू शकता की ते आपल्यासाठी आनंदी आहेत”. तर सुरुचीनेही तिच्या पहिल्या लग्नाबाबत व नवऱ्याबाबत पहिल्यांदा भाष्य केलं. तिच्या मनातील भावना तिने व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मी खूप खूश आहे. माझा आनंद मी आता शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. हा क्षण माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता”. पुढे ती, ““सगळ्या गोष्टी खासगी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणून आमच्या नात्याबाबतही मी कुठे समजू दिलं नाही” असंही म्हणाली.
पियुषची याआधी दोन लग्न असफल ठरली आहेत. २०१० साली पियुष अभिनेत्री शाल्मली टोळ्येसह लग्नबंधनात अडकला. लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर ‘अस्मिता’ मालिकेदरम्यान त्याची ओळख मयुरी वाघसह झाली. आणि ते दोघे १ फेब्रुवारी २०१६ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांनतर त्याने मयुरीबरोबर घटस्फोट घेतला. दोन्ही लग्नात पियुषला असफलता मिळाली. त्यानंतर आता पियुष तिसऱ्यांदा सुरुची अडारकरसह लग्नबंधनात अडकला आहे.