अनेक मालिका, चित्रपटांतून आणि त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वातून अभिनेता किरण माने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जाळं आणि धूर संगटच असं म्हणत किरण मानेनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.’मुलगी झाली हो’ या मालिकेतील किरणच्या ‘विलास पाटील’ या भूमिकेला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं.(Kiran Mane controversy)
नशिबाचे फासे कधी फिरतील याचा काही नेम नसतो.याच मालिकेदरम्यान किरण माने वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.आणि त्यावेळी मुलगी झाली हो ही मालिका त्याला सोडावी लागली. त्या नंतर किरण माने प्रेक्षकांना बिग बॉस मराठी सीजन चार मध्ये पाहायला मिळाला. सुरवातीला लेचा पेचा वाटणारा हा स्पर्धक कधी टॉप पाच स्पर्धकांच्या रांगेत जाऊन बसला कळलं ही नाही.
किरण त्याच्या सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो,समाजातील, वैयक्तिक अशा अनेक गोष्टी बदल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत स्पष्टपणे मांडताना किरण पाहायला मिळतो.नुकताच रावरंभा हा चित्रपट प्रदर्शित झाला.त्यात किरणने ‘हकीमचाचा’ ही भूमिका साकारली आहे.या भूमीसाठी कृतज्ञता व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
पहा काय घडलं होत ? (Kiran Mane controversy)
पोस्टच्या कॅप्शन मध्ये किरणने म्हंटल आहे, त्यावेळी ही छोटी पण महत्वपूर्ण भूमिका लाखमोलाचा आनंद देणारी ठरली होती. वाढती लोकप्रियता डोळ्यात खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी माझ्या डोळ्या देखत माझ्या ‘विलास पाटील’सारख्या दिलदार, दिलखुलास, रांगड्या व्यक्तिरेखेचा खून केला होता. मी सैरभैर झालो होतो. अन्यायाविरोधात पेटून उठलो होतो. त्याचवेळी कुठूनतरी एखादा फरिश्ता यावा तसा हा ‘हकीमचाचा’ अलगद माझ्या जवळ आला.(Kiran Mane controversy)
हे देखील वाचा : मुलीबद्दल बोलताना अंगावर काटा आला- किरण मानेंनी केली लेकीसाठी भावुक पोस्ट
चार दिवस हकीमचाचा माझ्या शरीरात वास्तव्याला होता, त्यानं नकळत कसली दवा दिली खुदा जाने. माझा मेंदू, माझं मन एकदम शांत झालं.गेस्ट ऍपेरिअन्स असूनही ही भूमिका कायम माझ्या काळजाच्या जवळ राहील. ज्या काळात मी या सिनेमाचं शूटिंग करत होतो त्याकाळात मी आयुष्यातील एक मोठी लढाई लढत होतो.त्यावेळी त्या लढाईसाठी वेगळंच बळ या चाचानं दिलं मला.