मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, विनोदी अश्या विविध धाटणीचे अनेक चित्रपट येतात. मात्र त्यामध्ये श्रद्धा आणि भक्तीवर आधारित असणारे क्वचितच चित्रपट बनतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये ‘देऊळ बंद’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. देवावर विश्वास नसलेल्या शास्त्रज्ञावर आधारित असलेल्या चित्रपटाचे कथानक त्यावेळी प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. (Pravin Tarde on Deool Band)
पण तुम्हाला माहिती आहे? हा चित्रपट खरंतर डॉक्युमेंट्रीच्या रूपात बनणार होती. याचा खुलासा खुद्द त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी एक किस्सा सांगताना म्हणाले, “मी स्वतः देवाला मानत नव्हतो. पण माझ्या संघर्षाच्या काळात मी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यक्रमाचं मॅनेजमेंट बघत असताना चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी मला भेटायला आले. तेव्हा त्यांनी मला समर्थांवर डॉक्युमेंट्री करायची आहे, असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. मला समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी असतील, असे वाटले होते. पण हा फोटो दुसऱ्या कोणाचा तरी आहे, असं मी विचारलं. तर ते म्हणे, तुम्ही ओळखत असाल स्वामी समर्थांना? मग मी त्यांच्या फोटोला नमस्कार करत म्हणालो, ‘हे काय'”
हे देखील वाचा – Upendra Limaye Pravin Tarde: “तुला स्टेज वर येऊन मारेन…” उपेंद्र लिमयेंनी प्रवीण तरडेंना दिली होती धमकी, म्हणाले,”तुझी कुवत…”
“पुढे कैलास वाणी म्हणाले, आपल्याला एक डॉक्युमेंट्री बनवायची आहे, पाच लाखांचा बजेट आहे. खरंतर एवढ्याश्या बजेटमध्ये काहीच होणार नसलं, तरी मी आणि प्रणित कुलकर्णीने त्याला होकार दिला. तेव्हा ते पटकन म्हणाले, उद्या नाशिकला जायचं, कथा तयार करून ठेवा. त्यानुसार मी, प्रणित व कैलास वाणी त्यांच्या काही मित्रांसह नाशिकला निघालो. तिथं आम्ही स्वामी समर्थ गुरुपीठात पोहोचताच सगळ्यांनी मला विचारलं, कथा तयार आहे? मी म्हणालो, चर्चा करतोय त्यावर, तुम्ही व्हा पुढे. तोपर्यंत मी आणि प्रणित यावर चर्चा करत होतो. पण अचानक तिकडून निरोप आला, की तुम्हाला त्या माउलींनी बोलवलं. तेव्हा मी आणि प्रणित तिकडे निघालो आणि त्या माउलींसमोर बसलो. त्यांनी जेव्हा कथा सुरु करायचे सांगितले. विश्वास ठेवा, मला काहीच माहीत नव्हतं. मी तिथे फक्त एक काल्पनिक गोष्ट सांगितली, जी तुम्ही सगळ्यांनी चित्रपटात पाहिली.”
हे देखील वाचा – “त्या आजारी होत्या हे माहीत होतं पण…”, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर निवेदिता सराफ यांची पोस्ट, म्हणाल्या, “त्यांना पाहून मी…”
“पुढे त्या माउलींच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर हसले आणि जागेवरून उठून म्हणाले, ‘वाट्टेल तितके पैसे घ्या. पण मला याच्यावर डॉक्युमेंट्री नव्हे तर चित्रपट हवाय.’ पुढे ती कथा बनली, तसा चित्रपट बनला आणि तो लोकांनी डोक्यावर घेतला.”, असं प्रवीण तरडे म्हणाले. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी, निवेदिता सराफ, मोहन जोशी अशी तगडी स्टारकास्ट होती.