बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने रागाच्या भरात मोठं पाऊल उचललं आहे. मनीषने त्याच्या ड्रायव्हरवर चक्क चाकूने हल्ला केला. मनीष विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यानेच याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वतःच्या रागावर मनीषचं नियंत्रण राहिलं नाही. ५ जूनला (गुरुवारी) वर्सोवा येथील त्याच्या राहत्या घरी हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ६ जूनला (शुक्रवारी) मनिषवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनिषकडून घडलेला हा प्रकार आणि त्याबाबतची माहिती समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण प्रकरण नक्की काय? हे सविस्तर जाणून घेऊया. (filmmaker Manish Gupta stabbed driver)
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मनिषने त्याचा ड्रायव्हर राजीबुल इस्लाम लश्करवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो जागीच पडला. त्याला शुद्धही नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून राजीबुल मनिषसाठी काम करत आहे. तरीही द्वेषामधून ही संपूर्ण घटना घडली. राजीबुलने शुद्धीवर आल्यानंतर मनिषविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र अजूनही मनीष यांना अटक झालेली नाही. ड्रायव्हरचे वकील अली काशिफ खान मनीषच्या अटकेची मागणी करत आहेत.
आणखी वाचा – …अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…
तक्रारीमध्ये त्याने सांगितलं की, गेल्या तीन वर्षांपासून मी मनिष यांच्यासाठी मी काम करत आहे. २३ हजार रुपये मला पगार आहे. त्यानंतर मनिषवर ड्रायव्हरने अनेक आरोप केले. कधीच वेळेवर पगार देत नसल्याचं त्याने सांगितलं. ३० मेला मनिष यांनी मला नोकरीवरुनही काढून टाकलं. नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर राजीबुलला त्यांनी पगारही दिला नाही. पगार मागण्यासाठीच तो मनिषच्या घरी गेला होता. मात्र दरम्यान त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला.
भांडण अधिकाधिक वाढत गेलं. त्यामध्येच मनीष यांचं त्यांच्या रागावरचं नियंत्रण सुटलं. त्यांनी ड्रायव्हरवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर ड्रायव्हर जागीच कोसळला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही संपूर्ण घटना इंडस्ट्रीलाही हादरवून टाकणारी आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार’ चित्रपटामधून मनीष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. रहस्य, हॉस्टल, डरना जरुरी है, वन फ्राइडे नाइट सारख्या चित्रपटांचं मनीषने दिग्दर्शन केलं.