सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत सायली-अर्जुन यांच्यातील प्रेम हळूहळू बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूपच भावते. तो प्रेक्षकांचा प्रचंड आवडता अभिनेता बनला आहे. मालिकेप्रमाणे त्याची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरीही अगदी हटके आहे. त्याची बायको श्रद्धा ही एका मराठी कुटुंबातून आली आहे.
अमितने खऱ्या आयुष्यात प्रेमविवाह केला असला तरी अमितने त्याच्या बायकोला अजूनही प्रपोज केलेलं नाही. स्वत: अमितने याबद्दल सांगितले आहे. ठरलं तर मग मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले असून यानिमित्ताने ‘इट्स मज्जा’ने अमित भानुशालीबरोबर खास संवाद साधला. यावेळी अमितला त्याच्या खऱ्या आयुष्यातील बायकोबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
याचे उत्तर देत अमितने असं म्हटलं की, “खऱ्या आयुष्यात मी किंवा पत्नी श्रद्धा आमच्यापैकी कुणीच एकमेकांना तसं प्रपोज केलं नाही. मी तिला “लव्ह यू” असं कधीच म्हटलं नाही. मी थेट तिला “लग्न करशील का?” असं विचारलं. आम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलो नाही. त्याच्या खूप नंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्हाला कळलं की, आम्ही एकाच शाळेत होतो”.
सोशल मीडियाद्वारे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांनी गप्पा मारत एकमेकांचे नंबर घेतले. बोलता बोलता त्यांना ते अजूबाजूच्याच सोसायटीत राहत असल्याचे कळलं. हळू हलूय त्यांच्यात मैत्री झाली. पुढे मैत्रीच रुपांतर तहत मैत्रीत झाले आणि मग अमितने श्रद्धाला थेट लग्नासाठीच मागणी घातली त्यानंतर केवळ १५ दिवसांच्या रिलेशनशिपनंतर दोघे लग्नबंधनात अडकले”.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त मालिकेतील कलाकारांनी सेलिब्रेशन केलं. मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. सायली-अर्जुनच्या जोडीने तर प्रेक्षकांना चांगलीच भुरळच घातली आहे. अर्जुन सुभेदारची भूमिका साकारणारा अमित भानुशाली अनेकदा चर्चेत असतो.