‘ठरलं तर मग’ मालिकेच्या भागात असे पाहायला मिळत आहे की, अश्विन व कल्पना बातम्या पाहत असतात. तेव्हा तिथे अर्जुन- सायली पूर्णा आईला घेऊन घरी येतात. पूर्णा आई अश्विनला सर्व काही ठीक असण्याबाबत विचारते. यावर अश्विन काहीच ठीक नसून, खूप भयंकर बातमी असल्याचं सांगतो. तेवढ्यात चैतन्यही तिथे पोहोचतो आणि अर्जुनला बातमी पहिली का याबाबत विचारतो. यावर अर्जुन एकदम गोंधळतो आणि हे सर्व काय सुरु आहे असं विचारतो. शेवटी अश्विनकडून मोबाईल घेत अर्जुन बातमी बघताच साक्षी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः साधीभोळी असल्याचा बनाव करुन अर्जुन चैतन्य यांनी खोटे आरोप करत माझी फसवणूक केल्याचे आरोप करताना दिसते. (Tharal Tar Mag Serial Update)
अर्जुनने वैयक्तिक राग काढला असून चैतन्यही त्यात सामील झाला आणि खोट्या खुनाच्या आरोपात मला अडकवून माझ्या वडिलांना म्हणजेच महीपतलाही जेलमध्ये बंद केल्याचे आरोप साक्षी भर प्रेस कॉन्फरन्समध्ये लावते. याशिवाय मला न्याय मिळाला पाहिजे, असं आवाहनदेखील करते. खोटेनाटे पुरावे मिळवत आश्रम केसमध्ये माझ्यासारख्या निष्पाप मुलीला अडकवून टाकायचा अर्जुन- चैतन्यचा प्लॅन असल्याचेही साक्षी सांगते. हे सर्व गंभीर आरोप ऐकून अर्जुन चैतन्यला असं कसं झाल्याबद्दल विचारतो. तिला शंका आधीच आली असल्याचे चैतन्य अर्जुनला बोलून दाखवतो. पूर्णाआईसुद्धा ही बाब अत्यंत गंभीर असून इंटरनेटमुळे हे वाढायला अजूनच मदत होऊ शकते असं बोलते. साक्षी प्रेस कॉन्फरन्समध्ये गंभीर आरोप करणं सुरुच ठेवते. अर्जुन व चैतन्य टेक्नॉलॉजीच्या मदतीने फेक व्हिडीओ व फोटो बनवून नवीन खोटे पुरावे बनवू शकतात असंही साक्षी बोलते.
अर्जुन व चैतन्य यांच्यावर भ्रष्टाचारी वकील असल्याचासुद्धा साक्षी गंभीर आरोप करते. हे सर्व बघून अर्जुन प्रचंड चिडतो पण सायली लगेच त्याला शांत करत हेच तर साक्षीला अपेक्षित असल्याचे समजावते. सायलीला चैतन्यच्या अटकेची काळजी वाटताच अर्जुन साक्षीकडे पुरावे नसल्याने असं काही होणार नसल्याचं सायलीला सांगतो. पण आपण आजवर सादर केलेले सर्व पुरावे बेदखल होऊ शकतात अशी भीती अर्जुन मात्र बोलून दाखवतो. अर्जुन, अश्विन व चैतन्य यांना बातमीबद्दल लगेच फोन येऊ लागतात. चैतन्य रागाच्या भरात चिडून निघून जातो, पूर्णा आई आणि कल्पना त्याला थांबवायचा प्रयत्न करतात. अर्जुन व सायलीसुद्धा त्याला रोखायला लगेच त्याच्या मागे निघतात. चैतन्य घरी येऊन साक्षीवर प्रचंड संतापतो. तुझ्यावर प्रेम करण्याची लायकी नसल्याचं साक्षी चैतन्यला सांगते. त्यावर कुणालशी पण हेच केलं असल्याचा आरोप चैतन्य साक्षीवर लावतो. तुझ्यावर ही वेळ नको येऊ देऊस असं साक्षी उर्मटपणे चैतन्यला बोलते. यानंतर साक्षी चैतन्यला थेट मारायला निघताच सायली व अर्जुन तिथे पोहोचून तिला रोखतात. अर्जुन साक्षीला चैतन्यला काही झाल्यास पोलीस केस करण्याची समज देतो.
साक्षी घरातून तिघांनाही निघून जायला सांगते. चैतन्य पुन्हा एकदा साक्षीवर ओरडतो पण अर्जुन व सायली शांतपणे त्याला घेऊन जातात. मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, अर्जुनच्या ऑफिसविरोधात बघितलेली बातमी बघून इतर क्लाएंट पैसे मागायला येतात आणि काही भाडोत्री गुंड ऑफिसची नासधूस करताना अर्जुनवर चप्पल उगारतात पण सायली त्यांना रोखते. आता अर्जुन या सगळ्याला कसं उत्तर देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.