‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळत आहे की, सायलीला कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे घर सोडून जाताना सुभेदारांच्या घरातल्या तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी आणि या घरात घडलेल्या बऱ्या वाईट प्रसंगांच्या आठवणी तिला दाटून येतात. अगदी दारातून घराबाहेर पाऊल टाकतानाही सायलीला अर्जुनबरोबरच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात. याच आठवणीबरोबर घेऊन सायली अखेर सुभेदारांचे अन्नपूर्णा निवास सोडून जाते. घरचे सर्व झोपलेले असताना ती रात्रीच घर सोडून निघते. अर्जुनला सकाळी जाग येते तेव्हा सायली त्याला खोलीत दिसत नाही. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यांनतर तो कपाट चेक करतो तेव्हा अर्जुनला सायलीची बॅगसुद्धा न दिसल्याने तो अस्वस्थ होतो. अर्जुनला सायलीने लिहिलेली चिट्ठी सापडते. चिट्ठीत सायलीने लिहिलेले शब्द वाचून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि तो जागच्या जागी बेशुद्ध होऊन कोसळतो. कल्पना अर्जुनच्या खोलीत येते तेव्हा अर्जुन तापाने फणफणलेला दिसतो. कल्पना विमलला सायलीला बोलवायला सांगते. विमल कल्पनाच्या फोनवरुन सायलीला संपर्क करायचा प्रयत्न करते पण सायलीची बोलण्याची हिंमत नसल्याने ती फोन कट करते. पण अखेर सायली फोन उचलते तेव्हा विमल अर्जुनबद्दल सर्वकाही सांगते.
हे ऐकून सायली पुन्हा माघारी फिरते. दुसरीकडे प्रिया नागराजला डेडबॉडी आणण्याबद्दल विचारते. तेवढ्यात सुमन तिथे येते. पण नागराज डेडबॉडीच काम प्रियाने करावं म्हणून पाय मुरगळण्याचं नाटक करतो. अश्विन अर्जुनला चेक करतो तेव्हा सांगतो, अचानक बॉडी टेम्परेचर वाढल्याने त्याला असं अस्वस्थ झाल्यासारखं झालं आहे. तासाभरात अर्जुनचा ताप कमी न झाल्यास त्याला हॉस्स्पटलमध्ये ऍडमिट करण्याबद्दल घरच्यांना सांगतो. अस्मिता सायलीला सकाळी कुठे गेली होती असं विचारते. कल्पनासुद्धा सायलीला तुमच्यात सर्व ठीक आहे ना असं विचारते.
मालिकेच्या पुढील भागात आपण असे पाहणार आहोत की, अर्जुन सायलीला प्रपोज करतो. कॉन्ट्रॅक्ट संपलं तरी केस जिंकेपर्यंत इथेच राहावं असंही अर्जुन सायलीला सांगतो. त्यावर सायलीसुद्धा हे तिला मान्य असल्याचा होकार कळवते.