टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेल्या मालिकांच्या यादीत एका मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवले आहे. तसेच या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक खूप प्रेम करताना दिसतात. अशातच मालिकेत सायली व अर्जुन या पात्राला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत सध्या येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. (Tharal Tar Mag Promo)
सायली व अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं हे सत्य आता हळूहळू उघडकीस येताना पाहायला मिळत आहे. सायली व अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असल्याचं सत्य लग्न झाल्यापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं असतं. मात्र ही गोष्ट फक्त चैतन्यला माहीत असते. मध्यंतरी अर्जुन व चैतन्य यांच्यात वाद झाला तेव्हा चैतन्य रागाच्या भरात सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट साक्षीला सांगितलेली असते त्यामुळे साक्षी ही गोष्ट प्रियाला सांगते आणि सांगते की, आता तू सायली व अर्जुन यांचं खरं प्रेम नाही आहे. त्या दोघांनी लग्न देखील केलेले नाही ही गोष्ट तू जाऊन पूर्णा आजीला सांग.
त्यानंतर प्रिया सुभेदाराच्या घरी जाऊन सगळं काही सांगते. ते ऐकून पूर्णा आजीचा पारा चढतो आणि पूर्णा आजी जाब विचारायला सायलीकडे येते. त्यानंतर पूर्णा आजी सायलीच्या हाताला धरून तिला देवघरात घेऊन जाते आणि देवासमोर शपथ घ्यायला लावते की, तुझं आणि अर्जुनच खरं प्रेम आहे आणि तुमचं लग्न झालं आहे अशी शपथ घे. तेव्हा सायली देवघरात जाते आणि देवासमोर शपथ घेत म्हणते की माझा आणि यांचं लग्न झालं आहे आणि माझं यांच्यावर खूप प्रेम आहे. ही गोष्ट पाठीमागे उभा राहून अर्जुनदेखील पाहत असतो. तर सायलीने तर एकतर्फी प्रेमाची कबुली दिलेली असते. त्यामुळे अर्जुनला धक्काच बसलेला असतो.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन घराबाहेर येतो आणि चैतन्यला फोन लावून म्हणतो की, पूर्णा आजीला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संशय आला आहे. पूर्णा आजीने सायलीला देवासमोर शपथ घ्यायला देखील लावली तेव्हा चैतन्य विचार करू लागतो. तर इकडे स्मिता कल्पना आणि सायली बसलेल्या असतात. तेव्हा कल्पना म्हणते तुमच्या प्रेमावर संशय घेऊन पूर्णा आईने जरा अतिरेकच केला. यावर स्मिता म्हणते की, सायली व अर्जुनने तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे म्हणून तू असा विचार करत आहेस. आता सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य सर्वांसमोर येणार का?, की सायली अर्जुन आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसं लपवणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.