‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर होती. मात्र कालांतराने मालिकेत आलेल्या टर्न-ट्वीस्टमुळे या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतून उतरता क्रम घेतला. मालिकेत अनेकदा आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका कायमच प्रेक्षकांना पाहणं रंजक ठरलं. अशातच आता या मालिकेत एक रंगतदार ट्विस्ट आला आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांसह प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. (Aai Kuthe Kay Karte Serial Troll)
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट आला असून हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला आहे. मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही.‘आई कुठे काय करते’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
या एका धक्क्यानंतर आता मालिकांबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे. मालिका आता रंजक वळणावर असून ही मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अरुंधती प्रेक्षकांना मालिकेच्या या नव्या वेळेबाबत तसेच नव्या प्रवासाबाबत सांगतानाचा व्हिडीओ स्टार प्रवाह वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुने शेअर केला आहे. सदर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मालिकेला व अरुंधतीला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत नाराजी दर्शविली आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत असं म्हटलं आहे की, “मालिका खूप घाण केली आहे. त्या अरुंधतीला सुख मिळालेलं कधी दाखवलेच नाही. आतातर आशुतोषच काम केलं. त्यापेक्षा अनिरुध्दला मारायचं ना. आमची आवडती मालिका होती पण आता पाहणार नाही”, असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने असे म्हटलं आहे की, “नको येऊस परत बोर झालो तुला बघून. किती नवरे अजून करणार आहेस. नवीन प्रवासात आणि वेळेत हेच संस्कार दे तुझ्या मुलीला पण”, असा सल्ला अरुंधतीला दिला आहे.