मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री श्वेता शिंदेने आजवर अनेक भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत तिचं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी मालिका विश्वातील ‘काटा रुते कुणाला’, ‘वादळवाट’, ‘अवघाचि हा संसार’ या मालिकांद्वारे श्वेताने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर अभिनेत्रीने आपला मोरचगा निर्मिती क्षेत्राकडे वळवला. ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ व ‘लागीर झालं जी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती करत तिने निर्मातीक्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
shestमराठी नाटक, मालिका व चित्रपट अश्या तिन्ही क्षेत्रात अभिनय करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय यशस्वी निर्माती म्हणूनही तिचं प्रवास चालूच आहे. मनोरंजन क्षेत्रात कुणाच्याही पाठिंब्याशिवाय तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यादरम्यान अशोक सराफ यांच्यामुळे आपल्या आयुष्यात एक शिस्त आली असल्याचे तिने म्हटले. श्वेताने नुकतीच ‘झी नाट्य गौरव २०२४’ सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिने नाटकामुळे आयुष्यात शिस्त आल्याचे म्हटले.
आणखी वाचा – “त्याने दोन गोष्टी नाही केल्या तरी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली, “हा फरक…”
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये श्वेता असं म्हणते की, “माझं पहिलं ‘मनोमिलन’ नावाचं नाटक होतं. तेव्हा नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी होते. ते ब्लॅकआउट म्हणाले की आम्ही बाहेर चालत जायचो. तर या नाटकाची तालीम स्टेजवर चालायची. तेव्हा ब्लॅकआउटनंतर लाइट्स लागल्या तेव्हा मी बॅकस्टेजला गेलेच नव्हते, मी स्टेजवरच होते. तेव्हा मला कळलं की, ब्लॅकआउटला विंगेत जायचं असतं. तेव्हा चंदू सर म्हणाले अगं एक्झिट घे. तेव्हा मी त्यांना अंधारात चालणार नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मला विंगेत लाइट कसा बघायचा, चालू प्रयोगात एक्झिट कशी घ्यायची हे सगळं शिकवलं.”
यापुढे श्वेताने अशोक सराफ यांच्यामुळे तिच्या आयुष्यात शिस्त कशी आली. याबद्दल तिने सांगितले. तिने असं म्हटलं की, “अशोक मामांचं नाव मी आवर्जून घेईन. कारण त्यांच्यामुळे आयुष्यात शिस्त आली आणि वेळेचं महत्त्व कळायला लागलं. त्यांच्यातील एका दैवी शक्तीने त्यांनी सर्वांनाच अभिनयातले काही बारकावे सांगितले आहेत. तसंच त्यांनी मलाही खूप काही शिकवलं. पण त्याचबरोबर बॅकस्टेजच्या काही गोष्टीदेखील त्यांनी आम्हाला शिकवल्या आणि ते मी कधीच विसरणार नाही”.