‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका अधिक पाहिली जात आहे. मालिकेच्या कथानकाने आजवर मालिकेला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मालिकेत सध्या खूप मोठं संकट आल्यानंतर आता मालिकेत पुन्हा आनंद आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूनंतर अरुंधतीवर खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळालं. त्यांनतर अरुंधती आता या संकटातून सावरताना दिसत आहे. (Aai Kuthe Kay Karte Promo)
मालिकेत अरुंधतीचा लाडका मुलगा यशची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत यशाच्या लग्नाची देशमुखांच्या घरी धामधूम सुरु असते. लेकाच्या लग्नासाठी अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला तयार होते. मालिकेत आरोहीच्या सूनेचा चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो. आरोहीही देशमुखांच्या घरीच राहत असते. त्यामुळे हा कार्यक्रम तिथेच सुरु असतो. अरुंधतीही लेकाच्या व सूनेच्या आनंदात सहभागी होते. तर घरातील इतर मंडळीही लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांमध्ये धमाल-मस्ती करत असतात.
अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अरुंधती आरोहीच्या हातात चुडा भरत असते. हे पाहून संजना तिला टोकते. संजना अरुंधतीला म्हणते, “अगं अरुंधती थांब. तू का आरोहीच्या हातात चुडा भरत आहेस. तुला आता तो अधिकार राहिलेला नाही आहे”. हे ऐकून अरुंधती तिच्याकडे पाहू लागते. त्यावर लगेचच आरोही म्हणते की, “हे किती जुनाट, बुरसटलेले विचार आहेत. एखादया बाईने चुडा भरायचा की नाही हे तिचा नवरा आहे की नाही यावर अवलंबून असण्याचं कारण तरी काय आहे”. हे ऐकून अरुंधती चिडून कांचनला म्हणते, “या पुढच्या पिढीवर आई जास्त विश्वास ठेवू नका. असे केल्यास मनस्ताप, पच्छाताप सगळं काही तुम्हाला होणार आहे”.
संजना वारंवार अरुंधतीला टोकत असते. अरुंधतीला टोकण्याची ती एकही संधी सोडत नाही. आरोही,यशच्या लग्नातही संजना अरुंधतीला बोलण्याची एकही संधी सोडत आहे. आता यावर अरुंधती संजनाला काही उत्तर देणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.