‘आई कुठे काय करते?’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणाने ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मध्यंतरी मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचा हिरमोड केला होता. मात्र आता पुन्हा एकदा मालिकेच्या नव्या प्रवासाने प्रेक्षकवर्गावर छाप पाडली आहे. मालिकेत सध्या अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हेतर आशुतोषच्या मृत्यूनंतर सुलेखा ताईंनी अरुंधतीला बाहेरचा रास्ता दाखवला. यावेळी कांचन आजी मात्र अरुंधतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.
अशातच आता मालिकेत यश व आरोहीच्या लग्नापर्यंत मालिकेचे कथानक आले आहे. मालिकेत एकीकडे त्यांच्या लग्नाची धामधुम सुरु असतानाच अरुंधती आपल्या लेकाच्या लग्नात हिरीरीने सहभाग घेत आहे. मात्र हीच गिष्ट संजनाला खटकत आहेत आणि यामुळे ती अरुंधतीला टोचून बोलण्याचे एकही संधी सोडत नाही आहे. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन प्रोमो आला आहे. ज्यात रुपापली अरुंधतीचा अपमान करताना पाहायला मिळत आहे.
यामध्ये यशचा मेहंदी सोहळ्यानिमित्त अरुंधती रुपालीच्या हातावर मेहंदी काढत असते. यावेळी रुपाली अरुंधतीला असं म्हणते की, “अरुंधती तू माझ्या मेहंदीकडे लक्ष दे. हातावर अनिरुद्धचं नाव छान मोठ्या अक्षरात लिही. तो माझा नवरा आहे. त्यामुळे चार-चौघांत माझ्या हातावरील त्याची नाव उठून दिसायला हवे आहे.”
यापुढे रुपाली मुद्दाम अरुंधतीला दुखावण्यासाठी असं म्हणते की, “आता तुला बिचारीला मेहंदी काढणे कुठे शक्य आहे. नवरा गेला आहे की नाही तुझा? हातावर मेहंदी जरी काढलीस तरी लोक तुला नाव ठेवतील. नवऱ्याचे नाव कुठे लिहिणार आहेस तू?”
आणखी वाचा – विरोचकाने रुपालीला दिली वेगळीच शक्ती, नेत्राला देवी आईचा नवा संकेत, घरात भांडणं होणार
दरम्यान, ‘आई कुठे काय करते?च्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर काहणणी अरुंधतीची बाजू घेत संजनाविरुद्ध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मात्र संजनाची बाजू घेतली आहे.