मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्यांमध्ये शरद पोंक्षे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आपली परखड भूमिका आणि रोखठोक वक्तव्य यामुळे ते कायमच चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळेदेखील प्रसिद्धी झोतात येत असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात त्यांनी ‘वंदे मातरम’ हे दुर्दैवाने राष्ट्रीय गीत झालं आहे असं म्हटलं आहे.
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते भाषण देताना दिसत आहेत. या व्हिडीओला ‘वंदे मातरम’ असं कॅप्शन देत त्यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताबद्दलचा इतिहास सांगितला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “वंदे मातरम आणि जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत. पण दुर्दैवाने जे आपलं राष्ट्रगीत व्हायला हवं होतं, ज्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळायला हवा होता, ते आज आपलं राष्ट्रीय गीत झालं आहे. मी परवाच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला हिंदी राष्ट्रवाद सांगितला, जो काँग्रेसने स्वीकारला.”
यापुढे त्यांनी या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “मुळात ब्रिटिशांनी राष्ट्रीय काँग्रेसची उभारणीच हिंदी राष्ट्रवादावर केली. जेणेकरून राष्ट्रीय काँग्रेस कधीही पूर्ण स्वातंत्र्याची मागणीच करू शकणार नाही. हा हिंदी राष्ट्रवाद हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक मानला गेला आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भारताला जे परिणाम भोगावे लागले. त्यातला सगळ्यात पहिला परिणाम कोणाला भोगावा लागला असेल तर तो बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘वंदे मातरम’ या गीताला.”
आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, गायकाच्या आईने दिला बाळाला जन्म, वडिल फोटो शेअर करत म्हणाले…
दरम्यान, शरद पोंक्षेंच्या या व्हिडीओखाली अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कुणी त्यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे, टर कुणी त्यांच्या या वकतव्याला विरोड केला आहे. तसेच त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात श्रेयस तळपदे व गौरी इंगावलेसह त्यांचीदेखील प्रमुख भूमिका पाहायला मिळाली.