झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत होती. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.
मात्र आता नुकत्याच झालेल्या भागात रुपालीने राजाध्यक्ष कुटुंबातील ज्यांना ज्यांना संमोहित केले होते, त्यांची आता सुटका झाली आहे. केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस हे आता रुपालीच्या वशमधून बाहेर आले आहेत. ग्रहण संपल्यामुळे रुपालीची वशीकरणाची शक्ती संपली. तसेच देवीआई मूर्च्छित पडली होती, ती आता त्यातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता देवीआईच्या लेकी म्हणजेच नेत्रा व इंद्राणी आता रुपालीविरुद्ध लढू शकणार आहेत.
आणखी वाचा – पारू-हरीशच्या साखरपुड्यात मोठं विघ्न?, अहिल्यादेवींचा रागही अनावर, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
तसेच चौथ्या पेटीचा अर्थ समजून घेण्यासाठी रुपालीने इंद्राणीला एक श्लोक सांगितला होतं. तेव्हा इंद्राणी रुपालीच्या ताब्यात असताना तिने तो श्लोक पाठ केला होता. त्यामुळे आता देवीआईच्या लेकी व राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेजण चौथ्या पेटीच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन पाचव्या पेटीचा शोध घेणार आहेत.
आणखी वाचा – व्यावसायिक व उद्योजकांसाठी गुरुवारचा दिवस आर्थिक लाभाचा, तर ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार नवीन संधी
त्यामुके आता रुपालीच्या वशीकरणाच्या शक्तीतून बाहेर आल्यानंतर राजाध्यक्ष कुटुंबियांना पाचव्या पेटीचा शोध लागणार का? यात नेमकं काय दडलेलं असणार हे आता आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागासाठी प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे..