बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोचा ८वा सीझन सध्या सुरु आहे. या शोमध्ये आतापर्यंत दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि सनी व बॉबी देओल बंधूनी हजेरी लावली होती. ज्यात या कलाकारांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले होते. पहिल्याच भागात दीपिकाने तिच्या अफेअरबद्दल केलेल्या वक्तव्याची, तसेच देओल भावंडांनी त्यांच्या वडिलांबाबत केलेल्या खुलासा जोरदार चर्चेत आला होता. अशात शोच्या या नवीन भागात अभिनेत्री सारा अली खान व अनन्या पांडे यांनी हजेरी लावली. ज्यात साराने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Sara ali khan talks her breakup with kartik aryan)
काही काळ सारा व कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. तर, अनन्या देखील कार्तिकसह काही काळ रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर ती आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच या शोचा नवीन भाग समोर आला, ज्यामध्ये तिने कार्तिकबरोबरच्या ब्रेकअपवर स्पष्ट बोलली आहे.
हे देखील वाचा – ‘त्या’ बनावट व्हिडीओ प्रकरणानंतर सुवर्ण मंदिरात पोहोचली उर्फी जावेद, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
करणने यावेळी दोघींना कार्तिकबरोबरच्या नात्याबद्दल एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसह एकत्र येतात. मग तो मित्र असेल, व्यावसायिकरित्या असो किंवा रोमँटिक. विशेषतः जर मी या नात्यात असेन, तर मी या नात्याशी पूर्णपणे गुंतलेली असते.” ती पुढे म्हणाली, “असं नाही की, याने काही फरक पडत नाही. जे काही आज होईल, ते उद्या काही वेगळं होईल. पण शेवटी तुम्हाला या सर्व गोष्टींतून पुढे जावं लागेल. तसेच, या इंडस्ट्रीत राहून तुम्ही हे करू शकत नाही की, मी त्याच्याशी परत कधीच बोलणार नाही किंवा त्याला भेटणार नाही. आणि आपण असं कधीही बोलू शकत नाही.”
हे देखील वाचा – स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लगीनघाई; सुकन्या मोने, सुबोध भावेच्या पत्नीने केलं पहिलं केळवण, सुंदर सजावट अन्…
कार्तिक व सारा यांनी २०२० मध्ये ‘लव्ह आज कल’ नावाचा चित्रपट केला होता, जो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्यानंतर दोघांचं हे नातं फार काळ चाललं नाही. असं असलं तरी, हे दोघं काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात एकत्र दिसले होते.