मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही अग्रेसर आहेत. असाच प्रेक्षकांचा लाडका सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचं उत्तम दिग्दर्शन केलं हे जगजाहीरचं आहे. ‘चंद्रमुखी’ बरोबरच प्रसादचा नायक म्हणून आतापर्यंतचा अगदीच हिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’. या दोन्ही चित्रपटात अगदीच महत्त्वाच्या भूमिका त्याने पार पाडल्या आहेत.(Prasad oak talk about him work)
‘चंद्रमुखी’चं दिग्दर्शन तर ‘धर्मवीर’ मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रसादासाठी २०२२ हे वर्ष अगदीच अभूतपूर्व यशाचं आणि कौतुकाचं वर्ष होत असं म्हणायला हरकत नाही. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेकदा तो मंजिरीसह ट्रेंडिंग रिल्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. ‘छापा-काटा’ या कार्यक्रमाच्या मुलाखतीत त्याने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
या दोन्ही चित्रपटांबद्दल बोलताना तो म्हणाला, “‘चंद्रमुखी’ २९ एप्रिलला प्रदर्शित होणार असं घोषित केलं आणि दुसरीकडे मंगेश देसाईने ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी १३ मे ही तारीख घोषित केली. मी मंगेशला म्हंटल असं नको करुस २९ एप्रिलला ‘चंद्रमुखी’ येतोय, त्यावर तो म्हणाला प्रसाद आपल्याकडे तारीखच नाही. १३ मे नंतर १५ दिवसांनी प्रवीण तरडेचा ‘सरसेनापती हंबीरराव’ येत आहे. मंगेशकडे तारीख बदलण्यासाठी हट्ट केला. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला”.
आणखी वाचा: ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल
पुढे तो म्हणाला, ”मी माझ्या ‘माझा आनंद’ या पुस्तकात लिहिलं आहे. जवळजवळ मी ९६ तास झोपलो नाही. दिवसभर मी ‘चंद्रमुखीच’ एडिटिंग आणि रात्री ‘धर्मवीर’चं डबिंग करायचो. असं मी ९६ तास सलग केलं होत. अचानक तारीख जवळ आल्यामुळे इतकं दोन्ही ते गळ्याशी आलं होत. पण एका क्षणी मला असं वाटलं की, हे कुणाच्या बाबतीत घडत? तुझ्याबाबतीत घडतंय तर तू लकी आहेस. तर ते एन्जॉय कर त्याचा त्रास नको करून घेऊ. मग मी ते प्रचंड एन्जॉय केलं”. प्रसाद प्रत्येक काम मेहनत ,जिद्द आणि चिकाटीने करतो हे या प्रसंगामधून कळून येत आहे.