प्रत्येक कलाकाराला जेव्हा एखादं पात्र साकारण्याची संधी मिळते, तेव्हा कलाकार त्या पात्रासाठी विशेष मेहनत घेत असतात. भलेही ती भूमिका सकारात्मक असो, किंवा नकारात्मक. मालिकेतील सकारात्मक पात्रांना प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं आहे. तितकंच प्रेम नकारात्मक पात्रांना सुद्धा मिळालेलं आहे. मात्र अशी एक अभिनेत्री आहे, जिला या दोन्ही भूमिकांसाठी विशेष प्रेम मिळालं आहे. ती म्हणजे मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक. (Atisha Naik on SMNKA Jail Sequence)
अभिनेत्री अतिशा नाईक हिने छोटा पडदा, नाटक, चित्रपट अश्या सर्वच क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘आभाळमाया’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘फु बाई फु’, ‘घाडगे अँड सून’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत साकारलेल्या विविध भूमिकांमुळे तिला एक विशेष ओळख मिळाली आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही तिने तिच्या अभिनयाची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. याच अभिनेत्रीने ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती.
अतिशा नाईक काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत झळकली होती. ज्यात तिने जयदीपची आई म्हणजे मंगलची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, मालिकेत अतिशाची एंट्री ही तुरुंगातून होते. तिच्या या मालिकेतील आगळ्यावेगळ्या एंट्रीचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. मात्र शूटदरम्यान तिला वेगळं दडपण आलं होतं. ते सांगताना अभिनेत्रीने तिच्या खऱ्या आयुष्यात आलेला अनुभव शेअर केला.
हे देखील वाचा – मराठी मालिकेमधून काढून टाकण्यामागचं सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं कारण, खुलासा करत म्हणाली, “आजारी असल्यामुळे त्यांनी मला…”
‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात बोलताना अतिशा म्हणाली, की “माझी या मालिकेतील एंट्री तुरुंगातील सीनने होते. तेव्हा मला त्या पांढऱ्या कपड्यातच काहीतरी वेगळं वाटत होतं. इथे काय आहे, हे लोक असं कसं राहत असतील, असा विचार आला होता. कारण मला याचा काही अनुभव नव्हता. मालिकेतील ‘त्या’ सीनचं शूट वसई किंवा विरारला होतं. मात्र, त्या जेलचा काही सेटअप केला होता, ते पाहून मला त्याचं दडपण आलं होतं. भलेही ते खोटं असलं तरीही. जसं दडपण मला अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट दिल्यावर आलं होतं.”
हे देखील वाचा – वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला जीव, डेंग्यु ठरला निमित्त, शेवटची पोस्ट पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
“मी जेव्हा अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीत गेले होते. तेव्हा त्या कोठडीत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, हे दार उघडतंच आहे, मी स्वतंत्र असून मी कधीपण इथून आत येऊ शकते, बाहेर पडू शकते, बघू शकते. काय केलं असेल त्यांनी त्याकाळात, केवढा तो संघर्ष केला होता त्यांनी. त्यांनी एवढं महाकाव्य लिहावं, ते पाठ करावं कारण ते काव्य लिहायला काही नव्हतं त्याकाळात. त्यामुळे जेलबद्दल म्हणायला गेला, मला त्या सेटवरचं दडपण नव्हतं वाटलं, तर अंदमानमधील सावरकरांच्या कोठडीत गेल्यावर वाटलं होतं.”, असं अतिशाने सांगितलं.