छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरात पहिला जाणारा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक. हास्यजत्रातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं असून यांमुळे अनेक कलाकार आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेला कलाकार म्हणजेच प्रसाद खांडेकर. एकांकिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रसादने हास्यजत्रेसह अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलेलं असून अभिनयाबरोबर त्याने अनेक नाटकांचे दिग्दर्शनदेखील केले आहे. (Prasad Khandekar new film Announced)
काही दिवसांपूर्वी प्रसादने त्याच्या चाहत्यांसमोर आनंदाची बातमी शेअर केली होती. प्रसादने नुकतंच नवीन घर खरेदी केलं असून त्याचे फोटोज त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच, आता त्याने त्याच्या चाहत्यांसमोर आणखी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रसाद खांडेकर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शिवाय, त्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनदेखील केलं आहे. याची माहिती खुद्द त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
हे देखील वाचा – “आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला”, भारताने आशियाई चषक जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवची मजेशीर पोस्ट चर्चेत
अभिनेता प्रसाद खांडेकर लवकरच “एकदा येऊन तर बघा-रिटर्न जाणार नाही !” हा चित्रपट घेऊन येत आहे. ज्याचे लेखन व दिग्दर्शन खुद्द प्रसादनेच केले आहे. अभिनेते सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, भाऊ कदम, ओंकार भोजने, रोहित माने, वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर अभिनेता प्रसाद खांडेकरदेखील यामध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हे देखील वाचा – ‘नवा गडी नवं राज्य’ मलिका बंद होणार असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “आता ही मालिका…”
नुकतंच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामध्ये चित्रपटातील कलाकार दिसत आहे. येत्या २४ नोव्हेंबरपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना प्रसाद म्हणतो, “लेखक दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा. अस्सल मराठमोळ्या कॉमेडीचा तडका मारलेली, लहान-मोठे सगळयांना पोट भरून हसवणारी, २४ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात सुरु होतेय मनोरंजनाची हमखास गॅरंटी असलेली भरपेट मेजवानी “एकदा येऊन तर बघा – रिटर्न जाणार नाही!”.
रोहन रोहन व कश्यप सोमपुरा यांनी संगीत दिलं असून पारितोष पेंटर, दीपक कृष्ण चौधरी, राजेश मोहंती यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेक्षक या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून या चित्रपटातून प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन मिळणार आहे.