‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू आणि वैजूची ताटातून झालेली असते. वैजूला दिशा व दामिनीने लपवून नेलेलं असतं आणि तिला एका मटण विक्रेत्याला विकलेलं असतं. वरून तोंड बंद करण्यासाठी दिशाने त्याला पैसेही दिलेले असतात. तर बंगल्यात कुठेच वैजू सापडत नाही हे समजतात पारू आदित्य व प्रीतमला घेऊन बंगल्या बाहेर शोधायला जाते. तितक्यात मारुती व सावित्री यांना बंगल्याबाहेरचा सुरक्षा रक्षक येऊन दामिनी मॅडमने वैजूला एका मटन विक्रेत्याला विकले असल्याचं सांगतो. हे ऐकून मारुती व सावित्री यांच्या पायाखालची जमीन सरकते. (Paaru Serial Update)
तर इकडे पारू, आदित्य, प्रीतम वैजूला शोधायला बाहेर पडलेले असतात मात्र पारू काही तिचा फोन घेऊन जात नाही. सावित्री तिला फोन लावण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा फोन ती उचलत नाही तेव्हा लक्षात येते की पारूने मोबाईल घरीच ठेवला आहे. त्यानंतर ती प्रीतमला फोन लावते तेव्हा पारू तिच्याशी बोलते तेव्हा कळतं की एका मटण विक्रेत्याला दामिनीने तिच्या वैजूला विकलेल आहे. हे सगळं कळल्यावर पारूच्याही पायाखालची जमीन सरकते. पारू आदित्य व प्रीतमला ही गोष्ट सांगते त्यानंतर ते एका मटण विक्रेत्याच्या दुकानासमोर येतात तर तो मटण विक्रेता वैजूला मारणार इतक्यात आदित्य वैजूला उचलून घेतो आणि सांगतो की, ही आमची वैजू आहे. त्याच्यामुळे तुम्ही हिला मारू शकत नाही.
त्यानंतर पारू वैजूला जवळ घेते आणि ढसाढसा रडू लागते आणि सांगते की हे अजूनही छोटसं बाळ आहे. तुम्ही हिला कसं मारू शकता यावर मटन विक्रेता सांगतो की, आमचा हा धंदाच आहे आम्हाला हे करावंच लागेल आणि ती माझी आहे त्याच्यामुळे तिचं काय करायचे ते मला मला ठरवू द्या. तुम्ही तिला माझ्याकडे द्या हे ऐकल्यावर पारू नकार देते. त्यानंतर आदित्य म्हणतो की ती आमची पाळीव बकरी आहे हे ऐकल्यावर मटन विक्रेता म्हणतो की, मी तिला विकत आणलं आहे. त्यानंतर आदित्य सांगतो की तिला चोरून तुमच्याकडे आणून दिलं. तुम्ही सांगाल ती किंमत या बदल्यात द्यायला मी तयार आहे. तेव्हा मटण विक्रेता पाच हजार रुपये किंमत सांगतो आणि आदित्यकडून पाच हजार रुपये घेतो. घरी आल्यानंतर इकडे दामिनी मटन विक्रेत्याने दिलेलं मटन घेऊन पारूजवळ येते आणि सांगते की हे मटन घे आणि शिजवून खा. तुझी ती बकरी आता पुन्हा काही यायची नाही. हे ऐकल्यावर पारू शांतच बसते तर गणी जोरजोरात रडू लागतो. तेव्हा दामिनी मारुतीला सांगते की तुमच्या वैजूला मीच गायब केलं आहे, आता ती पुन्हा काही तुम्हाला मिळायची नाही. तितक्यात तिथं आदित्य व प्रीतम येतात आणि आदित्य वैजूला गणीकडे देतो. हे पाहून दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उतरतो. दामिनी म्हणते की, ही बकरी तुमच्याकडे कशी आली मग मटन विक्रेत्याने मला काय दिला आणि पिशवीत हात घालून बघते तर तिच्या हाताला शेण लागत.
तेव्हा प्रीतम दामिनीची चांगलीच कानउघडणी करतो तर आदित्य ही दामिनीला चांगलं सुनावतो. तर इकडे दामिनी त्यांना धमकावते की, आता ही गोष्ट जेव्हा वहिनींना कळेल तेव्हा वहिनी काय करतात ते बघू असं म्हणून तिथून निघून जाते, आता अहिल्यादेवी ना वैजूचं सत्य कळणार का?, अहिल्यादेवी यावर काय निर्णय घेणार?, खोटं बोलल्याप्रमाणे पारूला शिक्षा होणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.