‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्य आणि प्रीतम एकत्र बोलत असतात तेव्हा आदित्यला खूपच वाईट वाटत असतं की, त्याने या सगळ्या गोष्टी आई पासून लपवून ठेवल्या. आईची फसवणूक केली असल्याचा पश्चाताप त्याला होतो. यावर प्रीतम सांगतो की, हे सगळं मी तुला करायला सांगितलं म्हणून तू केलं त्यामुळे मी आईशी जाऊन बोलतो. आई जी काय शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. यावर आदित्य प्रीतमला सांगतो की, तू आज माझ्या आणि आईच्या मध्ये पडू नकोस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्याची शिक्षा ही मला मिळायलाच हवी आणि माझं मनही मोकळं व्हायला पाहिजे नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं म्हणत तो अहिल्यादेवींना फोन लावतो. (Paaru Serial Update)
तर इकडे अहिल्यादेवी दिशा बरोबर तिचं नवं रेस्टॉरंट पाहायला आलेल्या असतात. नवं रेस्टॉरंट हे दिशाने एकटीनं उभं केल्याने त्या तिचं कौतुक करत असतात. त्यावेळेला आदित्यचा फोन येतो हे लक्षात येताच दिशा मुद्दाम अहिल्यादेवींना बोलावू लागते. तेव्हा अहिल्यादेवी सांगतात एक मिनिट हा दिशा. तेव्हा आदित्य सांगतो की, मला तुझ्याशी अर्जंट काहीतरी बोलायचं आहे. तितक्यातच दिशा अहिल्यादेवींना बोलवते हा आवाज आदित्य ऐकतो आणि म्हणतो की, जाऊ दे आई तू संध्याकाळी आलीस की आपण बोलू. तितकं असं काही अर्जंट नाही आहे. आता तू दिशा बरोबर वेळ घालवं. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींनाही टेन्शन येतं. तर अहिल्यादेवी दिशा बरोबर तिथं बोलू लागतात. त्यानंतर तिकडे प्रीतम रस्त्याने जात असतो तितक्यात त्याला गावाकडे आवडलेल्या शिक्षिका मुंबईत आलेल्या पाहायला मिळतात. त्यांना पाहून तो गाडी थांबवतो आणि बाहेर येतो. तितक्यात त्यांची कोणीतरी पर्स चोरतात तेव्हा प्रीतम ती पर्स त्यांना मिळवून देतो.
आणखी वाचा – जय दुधाणेच्या वडिलांचे निधन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, म्हणाला, “माझा सुपरहिरो गमावला”
मात्र त्या काही प्रीतमला ओळखत नाही. तेव्हा प्रीतम म्हणतो की, अखेर माझी डेस्टिनी माझ्याजवळ आली असं म्हणत तो खूप खुश होतो. त्यानंतर आदित्य प्रीतमला कामानिमित्त बोलावून घेतो. प्रीतमच काम झाल्यावरही त्या मॅडम मुंबईत आल्याचं कळवायला प्रीतमला फोन करतात आणि सांगतात की, मी तुमच्याशी बोलू शकते का?, मी मुंबईत आले आहे आणि ही मुंबई नगरी खूपच मोठी आहे. मी पहिल्यांदाच मुंबईत आले आहे असं सगळं सांगत असते आणि प्रीतम सुद्धा ते ऐकत असतो. तेव्हा ती सांगते की, मी उद्या आदित्य किर्लोस्कर यांना भेटणार आहे. आदित्य किर्लोस्कर हे माझे रोल मॉडेल आहेत आणि त्यांना भेटण्याची मला संधी मिळाली आहे. त्यांच्या कंपनीकडून मला फोन आला होता त्यामुळे मी त्यांना भेटायला इथं वर आलो आहे. हे ऐकल्यावर प्रीतम आणखीनच खुश होतो. प्रीतम मनात म्हणतो की, आता या मॅडम तर आपल्या घरातच येणार म्हणजे माझा काही प्रश्नच नाही असं म्हणत तो खूप खुश होतो. मात्र तो स्वतःची ओळख तिच्यापासून लपवून ठेवतो.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दिशा आणखी एक नवीन डाव आखत अहिल्यादेवीसमोर ऍड शूटचं सत्य कसे येणार याचं प्लॅनिंग करत असते. तर इकडे प्रीतम व आदित्य बोलत असतात तेव्हा प्रीतम आदित्यला सांगतो की, आपल्याला ऍडशूटसाठी अवॉर्ड ही जाहीर झाला आहे हे ऐकून आदित्य खुश होतो मात्र तो म्हणतो की पण आता आईला जेव्हा कळेल तेव्हा काय होईल याचं मला टेन्शन आलं आहे. आता मालिकेत अहिल्यादेवी समोर सगळे सत्य येणार तेव्हा त्या काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.