‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, पारूने हरिषबरोबर लग्नास होकार दिलेला असतो. आदित्यच्या म्हणण्यानुसार पारू हरिशची परीक्षा घेते. पारू हरिषला सांगते की, तुम्ही माझ्याबरोबर लग्न करायला नकार द्या. माझी आता लग्न करायची इच्छा नाही आहे. कृपया तुम्ही स्वतः मला समजून घ्या. पारूच्या डोक्यात असं असते की, हरीशने मला नकार दिला तरच मी त्याला होकार देणार. आणि त्याने जर होकार दिला तर ती स्वतः या लग्नाला नकार देणार. तेव्हा तिथे मारुती येतो मात्र पारू मारुतीचं ही काही ऐकत नाही. त्यानंतर अहिल्यादेवी सगळ्यांच्या समोर पारूला विचारतात की, पारु तू लग्नाला तयार आहेस की नाही?, हे ऐकल्यावर पारू सुरुवातीला काहीच बोलत नाही. (Paaru Serial Update)
त्यानंतर हरीश स्वतःच म्हणतो, अहिल्या मॅडम मला काहीतरी बोलायचं आहे. मी या लग्नाला नकार देत आहे आणि मी हे लग्न करायला तयार नाही कारण माझं आणि पारूचं स्टॅंडर्ड हे एकसारख नाही आहे. पारू या घराची मोलकरीण आहे. तिचे बाबा ड्रायव्हरचं काम करतात आणि मी एका चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. त्याच्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत. हे ऐकल्यावर देवींचा संताप होतो अहिल्यादेवी हरीशला म्हणतात तू काय बोलतो आहेस तुझ तुला कळतंय का? पारू या कंपनीची ब्रँड एमबेसिडर आहे आणि मारुती हा आमच्या घराचा एक भाग आहे. तू ड्रायव्हर आहे असं कसं म्हणू शकतो. तुझी विचार करण्याची क्षमता इतकी खालची असेल असं मला वाटलं नव्हतं. आदित्य याला आताच्या आता इथून निघून जायला सांग आणि आपल्या कंपनीत हा माणूस पुढे काम करणार नाही असं म्हणतात. त्यानंतर हरीश तिथून जायला निघतो तेव्हा आदित्य त्याला थांबवतो आणि म्हणतो की, पारू पाहिलंस का हरिश सगळं पणाला लावून बसला. त्याचं काम पैसा आणि तुला. तेव्हा सगळ्यांना कळत नाही की आदित्य नेमकं काय बोलत आहे.
आदित्य सगळ्यांना सांगतो पारू त्याची परीक्षा घेत होती. त्यानंतर पारू हरीशबरोबर साखरपुडा करायला तयार होते. लगेचच दुसऱ्या दिवशी साखरपुडा करायचं अहिल्यादेवी सांगतात. मात्र एका दिवसात सगळं कसं करायचं म्हणून सगळ्यांची धावपळ होते. त्यानंतर सगळेचजण कामाला लागतात. मारुतीच्या घरासमोर साखरपुडा करायचं ठरतं. सगळेजण जोरदार तयारी करत असतात तेव्हा आदित्यही सगळ्यांना मदत करत असतो तितक्यात दिशा आणि अहिल्यादेवी बाहेर जात असतात तेव्हा दिशा कीर्लोस्कर कंपनीचा सीईओ एका मेडच्या साखरपुड्याची अशी तयारी करतोय हे जर मीडियाला कळालं तर काय होईल. म्हणजे हे किती चुकीच दिसेल. यावर अहिल्यादेवी थोडा विचार करतात आणि त्यांनाही हे थोडंसं पटतं. त्यानंतर ते आदित्यला बोलावून घेतात आणि आदित्यची चांगलीच कान उघडणी करतात. त्या म्हणतात की, तू एका कंपनीचा मालक आहेस. लाखो लोक तुझ्या भरोशावर आहेत. त्याच्यामुळे तू सर्वांना समानच वागणूक दिली पाहिजे.
आणखी वाचा – सुंदर सजावट, प्रशस्त जागा अन्…; अमेरिकेत असं आहे मृणाल दुसाणीसचं घर, पाहा Inside Photos
पारू आणि मारुती तुझ्या जवळचे आहेत हे मला मान्य आहे तरीसुद्धा तू कंपनीकडे दुर्लक्ष करून या कार्यक्रमात अति सहभागी होणं फार चुकीचे आहे. ही गोष्ट आदित्यलाही पटते. त्यानंतर सगळेचजण तयार होत असतात. तयार झाल्यानंतर इकडे सगळेजण साखरपुड्याचा कार्यक्रम करायला येतात. तेव्हा पारू अहिल्यादेवींनी फेकून दिलेली साडी तिच्या या खास दिवसासाठी वापरते. हे पाहून अहिल्यादेवींना धक्का बसतो. तर श्रीकांत अहिल्यादेवींना म्हणतो तू फेकून दिलेली साडी पारुने तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या दिवशी नेसली आहे. यावरूनच कळतं की, तिला तुझ्याबद्दल किती आदर आणि कृतज्ञता आहे. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार असतो. हरीश पारूच्या हातात अंगठी घालतो आणि पारू अंगठी घालायला जाते तितक्यात ती अंगठी खाली पडते आणि घरंगळत आदित्यच्या पायाजवळ येऊन थांबते. आता मालिकेच्या आगामी भागात पारू हरीशला अंगठी घालणार का?, नक्की काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.