‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी समोर सत्य आलेलं असतं त्यामुळे अहिल्यादेवींचा संताप अनावर झालेला असतो. आदित्य त्यांना खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र अहिल्यादेवी काहीच ऐकून घेत नाहीत. त्या आदित्यवर प्रचंड रागावलेल्या असतात आणि सांगतात की, तुझा आणि माझा संबंध संपला आहे. यापुढे तु मला आई म्हणून सुद्धा आवाज द्यायचा नाही. तुझ्या आणि माझ्यामध्ये चुकीची भिंत उभी आहे आणि तू त्या भिंतीच्या पलीकडे फार दूर गेला आहेस. तू माझा आदित्य आता राहिला नाहीस, असं म्हणून त्या राग व्यक्त करतात. त्याच वेळेला प्रीतम मध्ये बोलतो मात्र अहिल्यादेवी सांगतात की, हा माझा आणि आदित्यचा प्रश्न आहे त्यामुळे यामध्ये कोणीच बोलू नये. आणि आताही योग्य वेळही नाही. (Paaru Serial Update)
हे ऐकून आदित्य सांगतो की, कोणी काही बोलू नका. आईला काही जे काय बोलायचे आहे ते बोलू द्या. आई तू मला शिक्षा दे, आला पण तू स्वतःला शिक्षा करुन घेऊ नकोस. यावर अहिल्यादेवी आणखी चिडतात आणि तिथून निघून जातात. आदित्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र अहिल्यादेवी काही थांबत नाहीत. आणि त्या तिकडून निघून जातात तेव्हा प्रीतम आदित्यला समजावतो आणि सांगतो की, त्यावेळेला जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला सांभाळण्यासाठी आपण योग्य असा निर्णय घेतला आणि आपण आईला सांगायचा प्रयत्न सुद्धा केला पण तिनेच फोन उचलला नाही. हे ऐकल्यावर श्रीकांतही प्रीतमवर भडकतो आणि म्हणतो की अशी काय परिस्थिती होती जे तुम्हाला अहिल्याला सांगावसंही वाटलं नाही. यानंतर प्रीतम पुढे येतो आणि सगळं काही खरं सांगतो. प्रीतम सांगतो की, ऍडशूटला फक्त पाच मिनिट असतानाच हरीश तिथून गायब झाला. हरीश कुठे गेला हे कोणालाच माहीत नव्हतं. आम्ही त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. काउंटडाऊन सुरु झालं म्हणून आम्हाला आदित्य दादाला मॉडेल म्हणून उभं करावं लागलं. आणि त्याच वेळेला हरीशला बेशुद्ध केल्याबद्दल श्रीकांत त्यांना विचारतो.
यावर उत्तर देत असतानाच दामिनी मध्ये बोलते आणि सगळं काही घडाघडा बोलून मोकळी होते आणि सांगते की, मी काही त्या वेटरला पैसे दिले नाहीत आणि मी त्याच्या सरबतात औषधे टाकले नाही आहे. हे ऐकल्यावर मोहन सांगतो की पाहिलं दादा हे कोणी केलं याचं सत्य तुझ्यासमोर आलंच आहे हे ऐकल्यावर श्रीकांतला धक्काच बसतो. दामिनी खूप मोठ मोठ्याने बोलते की मी त्याला शेवटपर्यंत नको करु असं सांगितलेलं तेव्हा मोहन तिच्या जवळ जातो आणि तिच्या सणसणीत कानाखाली लगावतो. तर इकडे आदित्य श्रीकांतला सांगतो की, मी अहिल्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो आणि असं म्हणून तोही निघून जातो.
आणखी वाचा – त्रिनयना देवीने नेत्राला दिली नवीन शक्ती, विरोचकाला नवीन शक्तीबद्दल कळणार का?
त्यानंतर मोहन दामिनीला घराबाहेर काढतो आणि सांगतो की, या पुढे तुला या घरात जागा नाही, असं म्हणून तिला घराबाहेर काढतो आणि दार लावून घेतो. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, डायनिंग टेबलवर पारू गुळाचा शिरा घेऊन येते. ते पाहून श्रीकांत खूप खुश होतो. तर अहिल्यादेवी उठून उभ्या राहतात. आता अहिल्या देवी यावर काय ऐकवणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.