छोट्या पडद्याकरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ‘कोकण कोहिनूर’ अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये अनेक पात्रांमध्ये विनोदाचे नवनवे रंग भरले. त्याने साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहण्यासारखी आहेत. विनोदी भूमिका साकारत ओंकारने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्ध झालेल्या ओंकारने काही दिवसांपूर्वी या शोमधून एक्झिट घेतली आणि त्याच्या या एक्झिटमुळे त्याच्या अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे प्रेक्षक व ओंकार भोजनेचे अनेक चाहते त्याच्या या शोमधील पात्रांची व भूमिकांची विशेष आठसवण काढतात. त्यामुळे त्याने पुन्हा या या शोद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करावे अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जातात. आशातच ओंकार नुकताच ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोद्वारे पेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा – नेत्रा, अद्वैत व इंद्राणी सोडून कुटुंबातील सगळेच सदस्य रुपालीच्या ताब्यात, त्रिनयनाच्या लेकी आता पुढे काय करणार?
त्यामुळे त्याच्या या शो मधील व त्याने केलेल्या त्याच्या आधीच्या कामामध्ये प्रेक्षकांकडून तुलना केली जात आहे. यावर ओंकारने भाष्य केले आहे. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यामध्ये सध्याच्या अनेक विनोदी कार्यक्रमातील कलाकारांची प्रेक्षकांकडून तुलना केली जाते. यावर ओंकारचं मत विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “तुलनात्मक कामांमध्ये माझा आधीपासूनच रस नाही. महाविद्यालायत उपक्रम म्हणून मी मला काही स्पर्धा कराव्या लागल्या आणि म्हणून मी त्या केल्या. पण तरीही प्रत्येक प्रतिस्पर्धी संघामध्ये माझे मित्र होतेच.”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “प्रत्येक प्रतिस्पर्धी माझे खूप वेळ प्रतिस्पर्धी नाही राहिले. ते माझे किंवा मी त्यांचा मित्र झालो आणि असंच कायम होत राहीलं. त्यामुळेच मी मुंबईत आल्यानंतर माझ्या त्याच मित्र-मैत्रीणींच्या ओळखीने किंवा आधाराने मी आता माझा प्रवास करत आहे किंवा आतापर्यंत टिकून आहे. त्यामुळे स्पर्धांत्मक कामांध्ये पूर्वीपासूनच रस नाही. त्यामुळे त्याबाबतीत येणाऱ्या प्रतिक्रियाही केवळ एक अभ्यास म्हणूनचं घेईन. बाकी त्याच्यापलीकडे त्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत किंवा त्याबाबतीत मी कधी विचारच नाही केला.