महाभारत’ मालिकेमध्ये ‘कृष्णा’ची भूमिकेमुळे नीतिश भारद्वाज घराघरांत पोहोचले. सध्या नीतिश त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. ते बरेच त्रस्त असून त्यांनी त्यांच्या IAS पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. भोपाळ येथील पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी स्मिताविरोधात तक्रार दाखल केली. नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मिता गटे यांच्यावर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप लावला. तसेच ती आपल्याला जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचा दावाही भारद्वाज यांनी केला. आता या प्रकरणात नीतिश यांच्या पत्नी स्मिता यांची बाजूदेखील समोर आली आहे. स्मिता यांनी कायदेशीररित्या जबाब दिला आहे. (Smita on Nitish Bhardwaj)
स्मिताने सांगिले की, “मी स्मिता भारद्वाज, नितीश भारद्वाज यांची पत्नी. माझ्या मुलींच्या सुरक्षेसाठी मला आरोपांवर उत्तर देणं गरजेचं होतं. तसेच माझे पती खोटे भाष्य करत आहेत आणि सतत माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. तसेच माध्यमांमध्येही चुकीची माहिती देत आहेत. माझ्या मुलींच्या अपहरणाबद्दलही खोटी माहिती देऊन माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आणि चुकीचे आरोप करत आहेत”.
पुढे त्या म्हणाल्या की, “खुद्द नितीश यांनी कौटुंबिक सत्रन्यायालयामध्ये सांगितले होते की, त्यांनी मुलींशी एकाच फोनवर बोलणे केले होते. त्यामुळे फोन नंबर चुकीचा असल्याचा त्यांचा दावा चुकीचा आहे”. तसेच स्मिता यांनी बरेच खुलासे केले. त्या म्हणाल्या, “जर नितीशला मुलींची इतकीच काळजी होती तर ते माझ्या वकीलांशी, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबरही बोलू शकत होते. पण त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला”.
नितीश यांनी पत्नी स्मिताच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले की, “पत्नी स्मिता यांनी त्यांच्या मुली देवयानी व शिवरंजनी यांना भेटू देत नाही आणि बोलू देत नाही. वारंवार मुलींची शाळा बदलत असते. ज्यामुळे नितीश यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे”. नितीश यांची पत्नी आयएएस असून दोघांचे लग्न २००९मध्ये झाले होते. २०१९मध्ये स्मिता व नितीश यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.