मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या आयपीएल हंगामात हवी तशी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरताना दिसतोय. पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला मोठया पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा या हंगामातील पुढील मार्ग आणखी खडतर होणार असल्याचं दिसतंय. चाहत्यांकडून मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडलं जात असताना आता माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धूयांनी देखील या चर्चेत उडी मारली आहे. नवज्योत सिंग सिद्धूच्या नवीन वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. (Rohit Sharma Hardik Pandya)
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील कर्णधारपदाची रस्सीखेच आणि मुंबई संघाची कामगिरी याबद्दल नवज्योत यांनी नवीन वक्तव्य केलं आहे. नवज्योत म्हणाले,” भारताचा हिरो, भारताचा कर्णधार आपल्या फ्रेंचायजीचा कर्णधार नाही ही गोष्ट कोणालाही सहन होणारी नाही. रोहित शर्माची नक्की काय चूक आहे?”. तसेच हार्दिक पांड्याची बाजू घेत नवज्योत म्हणाले “हार्दिक पांड्याची तरी यामध्ये काय चूक आहे? जर त्याच्या नेतृत्वाखाली मागचे सामने मुंबई जिंकली असती तर त्याला कोणीही कर्णधार पदाबद्दल प्रश्न विचारले नसते”. वानखेडेवरील सामन्या दरम्यान टॉस प्रसंगी हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीवर चाहत्यांनी दिलेल्या घोषणाविरोधात संजय मांजरेकर यांनी देखील चाहत्यांना नीट वागण्याचा सल्ला दिला.
Navjot singh siddhu speaks#navjotsinghsidhu #sport pic.twitter.com/BXJO8Uywh9
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) April 2, 2024
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर हार्दिक पांड्याला सर्वत्र ट्रोल केलं जाऊ लागलं. त्यामुळे रोहित व हार्दिक यांच्यामध्ये देखील काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण राजस्थान विरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याला टार्गेट केल्यानंतर रोहितने चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यावरून या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला. चाहत्यांनी हार्दिक पांड्याला विरोध केल्यानंतर अनेक खेळाडू मात्र हार्दिकच्या समर्थनार्थ उभे राहताना दिसतायत. (Rohit Sharma Hardik Pandya)
आता आगामी सामन्यात मुंबईच्या कर्णधारपदामध्ये बदल होणार का?, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला विजय मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. मुंबईचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर असून दिल्लीचा संघ देखील यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे.