सोशल मीडियावर जर कुणाला एखाद्या गोष्टीची चुणूक लागली तर नेटकरी मंडळी त्या गोष्टीच्या अक्षरश: मागे लागतात. ती गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे त्या गोष्टीची लगेच बातमीही होते अन् ती गोष्ट रातोरात सोशल मीडियावर व्हायरलही होते. सोशल मीडियावर सध्या मुकेश अंबानीच्या लेकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अंबानीच्या लेकाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबद्दलच्या अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अशातच आता सोशल मीडियावर अंबानीबद्दल आणखी एक बातमी व्हायरल होत आहे ती म्हणजे अंबानीच्या घरातल्या कचऱ्याची. अंबानींच्या घरातील कचरा नेमका जातो कुठे? याबद्दल सोशल मीडियावर अनेकांना प्रश्न पडला आहे. चला तर जाणून घेऊयात अंबानीच्या घराच्या कचऱ्याबद्दल आणि त्या कचऱ्याच्या विघटनाबद्दल. भारतातील सर्वात मोठ्या घरांमध्ये मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव घेतले जाते. त्यांच्या घरातील कचऱ्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांच्या घरातील कचरा कशासाठी वापरला जातो हे सांगण्यात आले आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांच्या घरातील कचऱ्यापासून वीज तयार होते, जी फक्त त्यांच्या घरासाठीच वापरली जाते.
अंबानींच्या घरातील कचरा फेकून दिला जात नाही, तर त्याचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. सर्वप्रथम सुका आणि ओला कचरा वेगळा केला जातो, त्यानंतर वीजनिर्मिती केली जाते. त्यांच्या घरात एका खास यंत्रणेद्वारे कचऱ्यापासून वीज तयार केली जाते, असे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या घरात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे या घरातील कचऱ्यापासूनच या घरात वीजनिर्मिती केली जाते.
अंबानींच्या घराचे नाव ‘अँटिलिया’ असून भारतातील सर्वात मोठ्या घरांमध्ये मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’चे नाव घेतले जाते. २७ मजली घरात एकूण ६०० नोकर राहतात जे या घराची देखभाल करतात. तसेच ‘अँटिलिया’ हे निवासस्थान जगभरातील लोकांचे आकर्षण आहे.