स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सध्या वादाचा विषय ठरत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. तसेच रणदीप हुड्डा चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. मात्र महेश व रणदीप यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. आता रणदीपच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. नुकतंच महेश मांजरेकर यांनी या वादाबाबत आपलं मत मांडलं होतं. आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी रणदीपला थेट इशारा दिला आहे.
अमेय खोपकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबाबत ट्वीट केलं आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी एक पत्रक शेअर केलं आहे. अमेय खोपकर म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं”.
“अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही शेवटपर्यंत ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत. भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगीत गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे. प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन वाद सुरु झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचं कार्य घराघरात पोचावं ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर राखाल अशी आमची अपेक्षा आहे”.
हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 10, 2023
हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये… pic.twitter.com/X1kg1ysJ8l
महेश मांजरेकर व रणदीपच्या वादामध्ये आता मनसेने उडी घेतली आहे. महेश मांजरेकरांनी रणदीपला घेऊन हा चित्रपट करण्याची तयार सुरु केली होती. चित्रपटावर काम करणंही सुरु झालं होतं. पण रणदीपला या चित्रपटाच्या कथेमध्ये अधिक बदल हवे होते. दरम्यान महेश यांना त्याच्याबरोबर काम करणं शक्य न झाल्यामुळे त्यांनी या चित्रपटामधूनच काढता पाय घेतला.