सिंघम रिटर्न्स’, ‘मुंबई मेरी जान’, ‘सत्ता’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून तसेच ‘लालबाग परळ’, ‘शेर शिवराज’, ‘वजन दार’, ‘बॉईज ३’ यांसारख्या हिट मराठी चित्रपटांधून आणि ‘चक्रवर्ती अशोका सम्राट’, ‘झाशी की राणी’ यांसारख्या अनेक मालिकांमधून अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणेज समीर धर्माधिकारी. त्यांचा अभिनयक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ते यशस्वी अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास हा वाखाणण्याजोगा होता. समीर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराबाबत आणि आताच्या पिढीचा संसाराकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोनाबाबत नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Sameer Dharmadhikari On Married Life)
“समाजात असं चित्र आहे की, लग्न थाटामाटात होत आहेत पण तरीही पती पत्नीपासून लांब राहणं अशा घटना घडताना दिसत आहेत, तर तुझ्या संसाराची जमेची बाजू कोणती आहे, आणि तू या गोष्टीकडे कसं ‘लालबाग परळ’, ‘शेर शिवराज’ पाहतोस?”, असा प्रश्न समीर धर्माधिकारी यांना विचारला असता, यावर उत्तर देत ते म्हणाले, “खरं सांगायचं तर आमच्या सुखी संसाराचं सर्व श्रेय माझ्या बायकोला जातं. कामानिमित्त आज इकडे तर उद्या दुसरीकडे असे दौरे सुरु असतात. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही आधीच्या पिढीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो. आमचं फार लवकर लग्न झालं. आमच्यावेळी वचन या शब्दाला अधिक महत्त्व होतं आणि आहे. कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे ज्या गोष्टी नाही आवडत त्या आम्ही कधीच सुधारायला जात नाही. अगदी समजुतीने या सगळ्या गोष्टी घडतात. मात्र आता अगदी याच्या उलट मला तुझा कंटाळा आला आहे, असं बोलून नाती संपतात. हे कदाचित शारीरिक आकर्षणामुळे घडत असावं”.
यापुढे ते म्हणाले, “आजकाल लिव्हिंग रिलेशनशिप ही प्रथा सुरु झाली आहे, त्यामुळे एखाद्या बाबतीतील कुतूहल तुम्ही खूप लवकर संपवता. तर काहींच असं म्हणणं आहे की, आम्हाला इतक्यात लग्न करायचं नाही, आम्हाला करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. आयुष्यातील एकटेपणाचं महत्त्व प्रत्येकाला समजायला हवं. नात्यामध्ये तडजोड ही करायलाच हवी. आई- बाबा हे आपल्याला बायोलॉजिकली मिळतात, पण एक असं नातं असत ज्याची तुम्हाला निवड करावी लागते. आणि ती निवड करताना तुमचा जर गोंधळ उडत असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही किती गोंधळलेले आहेत हे कळतं”.
पुढे ते असंही म्हणाले की, “आमच्या संसारात आयुष्य वेगळं आणि काम वेगळं आहे. घरी गेल्यानंतर सारखं चित्रपटाबद्दल बोलत राहणं, तिने एखाद्या सीनचा कसा शॉट लावला आणि एखादा सीन मी कसा दिला, या गोष्टींना वेळ नसतो. माझी बायको १२ तास शूट करुन घरी आल्यानंतर स्वयंपाक करायची. आणि त्यानंतर आम्ही शांतपणे जेवायचो. कधी मी लवकर आलो तर जमेल तितकं मी करायचो. हा संसारातील बॅलेन्स जमणं गरजेचं आहे. आणि त्यात मी अभिनेता आणि ती कॅमेरा क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आम्ही कायमच एकमेकांची प्रशंसाच करत गेलो”.