amruta khanvilkar travel : महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघरमध्येही पावसाने हाहाकार माजवला आहे. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर पावसाचा जोर पाहता नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वा आपातकालीन स्थितीतच घराबाहेर पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदाच्या दहीहंडीचा उत्सवही अगदी धुमधडाक्यात आणि वरुन राजाच्या उपस्थितीत पार पडला. अनेक कलाकार मंडळीही दहीहंडीनिमित्त कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी शहराबाहेर गेले होते. आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात पावसाने त्यांची बरीच तारांबळ उडाली.
यापैकीच एक म्हणजे अमृता खानविलकर. अमृतालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. बाहेरहुन मुंबईत परतताना अमृताला पावसामुळे बराच त्रास सहन करावा लागला. अमृता सकाळी विमान प्रवास करून मुंबईत परतली. या प्रवासाविषयी अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. विमानतळावरच अमृताचे अनेक हाल झाले आहेत. आणि मुंबईत येताच पावसानेही तिची चांगलीच तारांबळ झाल्याचं तिने सांगितलं आहे.

अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “साधारण १० वेळा हनुमान चालिसा पठण करुन मी पोहोचले आहे. आता इथून घरी जाण्यासाठी कोणाची होडी वगैरे मिळणार आहे का? प्रवास सुरुच आहे. माझी फ्लाइट सकाळी ७ वाजता होती. त्या फ्लाइटने टेकऑफ केले ९:३० वाजता. त्यानंतर जवळपास पाऊण ते एक तास मी विमानातच होते. आता विमान लँड झालंय. आता विमानतून उतरल्यावर आम्हाला बस मिळाली आहे, मग सामान मिळणार. त्यानंतर टॅक्सी किवा रिक्षाने भर पावसात घरी जायचंय. एकंदर BE NOW काय प्रवास सुरुच आहे”.
आणखी वाचा – ‘३ इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शेवटी अमृताने साऱ्यांना आवाहन करत म्हटलं की, “मी सर्वांना एवढंच सांगेन, आज घराबाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या. घरात थांबा”. सध्या अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमृताप्रमाणे इतर मराठी कलाकारांनी सुद्धा मुंबईकरांना सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.





