सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर बरीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी यांचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. मालिकेत त्यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरली आहे. ते नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहतेही कमेंट करताना दिसतात. मिलिंद यांनी एका मुलाखतीत त्यांचा डोंबाऱ्याचा खेळ चालू असल्याचं म्हटलं होतं. नेमकं कोणता खेळ ते खेळत आहेत आणि का याबाबत प्रेक्षकांना जाणून घ्यायची उत्सुकता असेलच. हा किस्सा त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.(Milind told no money story)
प्रत्येक कलाकराला आयुष्यात विविध कठीण प्रसंगाना सामोरं जावं लागतं. असे बऱ्याच कलाकारांचे किस्से आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मिलिंद यांनीही असाच एक किस्सा ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात सांगितला. “मुंबईत घर घेणं साधी गोष्ट नाही. इतक्या वर्षानंतर मी घर घेतलं पण त्याचे हफ्ते आजही मी भरत आहे. मी एक कलाकार आहे तरीही मला कामासाठी धडपड करावी लागते”.
वाचा – कलाकार म्हणून मिलिंद पुढील आव्हाने ?(Milind told no money story)
“आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या कलाकारालाही काम मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यांनाही काम मिळेलच याची शाश्वती नाही. काम करून पैसे मिळतील असेही नाही. ही गोष्ट माझ्या सुरुवातीच्या काळातली आहे. माझे बरेच पैसे इंडस्ट्रीत अडकून होते आजही ते मिळालेले नाहीत. बऱ्याच निर्मात्यांनी माझे पैसे दिले नाहीत. काहींनी मुद्दाम दिले नाहीत तर काहींनी ते स्वतःचं तोट्यात गेल्यामुळे दिले नाहीत. पण मी कधीच त्यांच्याजवळ ते मागितलेही नाहीत”.
पुढे सांगत ते म्हणाले, “आज बऱ्याचवेळा माझ्या खिशात पैसे नसतात. आता करोनानंतर कॅशलेस झालंय सगळं ते वेगळं. पण मागील २ वर्ष आपण सगळे घरातच होतो तेव्हा कलाकारांचीही बाकीच्यांसारखीच परिस्थिती झालेली. तेव्हाही इएमआयचे (EMI) हफ्ते चालूच होते. माझा आजही डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे तसा प्रत्येक कलाकाराचा हा खेळ चालूच असतो. तो कधीही थांबणार नाही”, कलाकारांची परिस्थिती त्यांनी स्पष्ट केली.मिलिंद यांनी आजपर्यंत बऱ्याच चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे.
मराठीसह त्यांनी हिंदी, मल्याळम चित्रपट तसेच बऱ्याच मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ते ‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून ते करत असलेल्या कामचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.